शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

दिसते ते सर्व असत्य!

By admin | Updated: September 12, 2014 00:48 IST

विश्वातील प्रत्येक गोष्ट बदलत असते. जी गोष्ट बदलत असते, त्याला आपण सत्य म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण विश्वात जे काही पाहतो. ते सत्य नसून, त्याच्या पाठीमागे वेगळेच काही विश्व आहे,

‘अध्यात्म व विज्ञान’ विषयावर व्याख्यान : गुर्जलवार यांचे प्रतिपादननागपूर : विश्वातील प्रत्येक गोष्ट बदलत असते. जी गोष्ट बदलत असते, त्याला आपण सत्य म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण विश्वात जे काही पाहतो. ते सत्य नसून, त्याच्या पाठीमागे वेगळेच काही विश्व आहे, असे प्रतिपादन डॉ. अनिरुद्ध गुर्जलवार यांनी केले. सी. पी. अ‍ॅण्ड बेरार शिक्षण संस्थेच्यावतीने शंकरराव पाध्ये स्मृतिप्रीत्यर्थ ‘अध्यात्म व विज्ञान’ या विषयावर गुरुवारी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. महाल येथील सी. पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल सुनील देशपांडे होते. अतिथी म्हणून सी. पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दत्तात्रेय बाराहाते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्नल देशपांडे यांच्या हस्ते डॉ. गुर्जलवार यांचा सत्कार करण्यात आला. सामान्य माणूस विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी वेगवेगळ््या समजत असला, तरी विज्ञान व अध्यात्म हातात हात घालून कसा प्रवास करीत आहे, हे डॉ. गुर्जलवार यांनी आपल्या व्याख्यानातून अतिशय सहज व सोप्या शब्दात पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, जेथे विज्ञान संपते, तेथे भारतीय अध्यात्माचे दर्शन घडते. सध्या आपण एका छोट्याशा खिडकीतून विश्व पाहत आहोत. त्यामुळे आपण जे पाहतो, ते काहीही सत्य नाही. आपल्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही असत्य आहे. त्यामुळे भारतीयांनी ते सत्य उलगडून काढले पाहिजे. मात्र त्यासाठी सर्वांना सत्याची प्रचिती यावी लागेल. एखाद्या गोष्टीचे ध्यान केले की, माणूस हा साधनेकडे जातो, आणि त्यातून त्याला ज्ञानप्राप्ती होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले. ं(प्रतिनिधी)