शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

‘नीट’ तीनदा देता येणे शक्य

By admin | Updated: February 5, 2017 01:44 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा प्रयत्न करून अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना, आता ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ने

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा प्रयत्न करून अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना, आता ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ने (एमसीआय) घेतलेल्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रवेश परीक्षा दिलेले विद्यार्थी २०१७ मध्ये होणाऱ्या ‘नीट’ला बसू शकतात. या आधी विद्यार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या, आता हा प्रश्न सुटलेला आहे. २०१७ मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तीन फेऱ्या यापुढे ग्राह्य धरल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे सर्वच विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षे ‘नीट’ द्यायला मिळणार आहे. या आधी केंद्रीय प्रवेश परीक्षा देणाऱ्यांना ‘नीट’ परीक्षेसाठी कमी संधी होती अथवा संधी नव्हती. कारण तीनपेक्षा अधिक वेळा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी होत्या. या तक्रारी आल्यानंतर एमसीआयने हा निर्णय घेतला आहे. या आधी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ‘नीट’च्या संधी कमी झाल्या होत्या अथवा तीनपेक्षा अधिक वेळा परीक्षा दिलेल्यांना ‘नीट’साठी अपात्र ठरवण्यात आले होते, पण आता हा प्रश्न सुटला आहे. यंदापासून ‘नीट’ सुरू करण्यात आली आहे. या आधी एआयपीएमटी या केंद्रीय परीक्षेद्वारे केंद्राच्या अखत्यारितील वैद्यकीय महाविद्यालये, राज्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील अखिल स्तरावरील कोटा इत्यादी ठरावीक जागांवरील प्रवेश होत. आता या परीक्षेऐवजी नीट घेण्यात येणार आहे. देशातील सरकारी, खासगी, अभिमत वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट (यूजी) परीक्षेसाठी १ मार्चपर्यंत विद्यार्थी आॅनलाइन फॉर्म भरू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोणताही त्रास होऊ नये, म्हणून देशभरात १ हजार ५०० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी नीट-१ आणि नीट-२ परीक्षेसाठी ८ लाख २ हजार ५९४ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेविषयी आणि आॅनलाइन फॉर्मविषयी अधिक माहिती ६६६.ूु२ील्लीी३.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)