शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

मुख्यमंत्र्यांचे आभारच मानायला हवे

By admin | Updated: January 29, 2015 05:52 IST

देशाच्या उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे आणि गुंतवणुकीसाठी उद्योजकांची पहिली पसंतीही राज्यालाच असते, असे विधान करीत

मुंबई : देशाच्या उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे आणि गुंतवणुकीसाठी उद्योजकांची पहिली पसंतीही राज्यालाच असते, असे विधान करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उशिरा का होईना महाराष्ट्राचे मोठेपण मान्य केले. त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा शब्दांत काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात राज्याचा वाटा सर्वाधिक आहे़ त्यामुळे उद्योजकांची पहिली पसंती महाराष्ट्राला असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केले. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, की मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपा नेत्यांनी महाराष्ट्राला कमी लेखण्याची सुपारीच घेतली होती. भाजपाचे केंद्रातीलच नव्हे, तर राज्यातील नेतेही महाराष्ट्रापेक्षा गुजरातच आघाडीवर असल्याची भाषा करीत पोकळ घोषणाबाजी करीत होते. सत्तेवर आल्यावर आता हेच नेते महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य असल्याचे सांगू लागले आहेत. पण उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र पहिला असल्याचा दृष्टांत झाला आहे. आता तरी त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखू नये, असा टोला सावंत यांनी लगावला.निवडणूक प्रचारात ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी भाजपाची जाहिरात दिशाभूल करणारी होती, हे आता मुख्यमंत्र्यांच्याच विधानातून स्पष्ट झाले आहे. भारतात येणाऱ्या गुंतवणुकीपैकी ३३ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याची कामगिरी काँग्रेस सरकारने बजावली. त्यामुळेच उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दिली. ही वस्तुस्थिती फडणवीसांनी मान्य केली, याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत, अशी कोपरखळी सावंत यांनी मारली.