शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

मुख्यमंत्र्यांचे आभारच मानायला हवे

By admin | Updated: January 29, 2015 05:52 IST

देशाच्या उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे आणि गुंतवणुकीसाठी उद्योजकांची पहिली पसंतीही राज्यालाच असते, असे विधान करीत

मुंबई : देशाच्या उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे आणि गुंतवणुकीसाठी उद्योजकांची पहिली पसंतीही राज्यालाच असते, असे विधान करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उशिरा का होईना महाराष्ट्राचे मोठेपण मान्य केले. त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत, अशा शब्दांत काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात राज्याचा वाटा सर्वाधिक आहे़ त्यामुळे उद्योजकांची पहिली पसंती महाराष्ट्राला असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केले. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, की मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपा नेत्यांनी महाराष्ट्राला कमी लेखण्याची सुपारीच घेतली होती. भाजपाचे केंद्रातीलच नव्हे, तर राज्यातील नेतेही महाराष्ट्रापेक्षा गुजरातच आघाडीवर असल्याची भाषा करीत पोकळ घोषणाबाजी करीत होते. सत्तेवर आल्यावर आता हेच नेते महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य असल्याचे सांगू लागले आहेत. पण उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र पहिला असल्याचा दृष्टांत झाला आहे. आता तरी त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखू नये, असा टोला सावंत यांनी लगावला.निवडणूक प्रचारात ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी भाजपाची जाहिरात दिशाभूल करणारी होती, हे आता मुख्यमंत्र्यांच्याच विधानातून स्पष्ट झाले आहे. भारतात येणाऱ्या गुंतवणुकीपैकी ३३ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याची कामगिरी काँग्रेस सरकारने बजावली. त्यामुळेच उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दिली. ही वस्तुस्थिती फडणवीसांनी मान्य केली, याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत, अशी कोपरखळी सावंत यांनी मारली.