शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा येणार ऐरणीवर

By admin | Updated: November 12, 2015 03:10 IST

उत्तर नगर जिल्ह्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी पुढे येत असून, दिवाळीनंतर शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत़ मुळा धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक आहे़

अहमदनगर : उत्तर नगर जिल्ह्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी पुढे येत असून, दिवाळीनंतर शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत़ मुळा धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक आहे़ पण, भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नसल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे़मुळा व भंडारदरा धरण उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरले आहे़ या दोन्ही धरणांमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील शेती फुलली,़ मात्र समन्यायी पाणीवाटप कायद्याने पाणी जायकवाडीला सोडण्यात आले़ प्राधिकरणाच्या या निर्णयाविरोधात उत्तरेतील साखर कारखाने व लोकप्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने याचिका फेटाळत मुळा व भंडादरातून आठ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय कायम ठेवला़ त्यानुसार मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यास प्रारंभ झाला़ मराठवाड्याला पाणी सोडण्यास उत्तर नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून विरोध झाला नाही़ मात्र जायकवाडीला सोडले तसे नगर जिल्ह्यातील शेतीला पाणी द्या, अशी आग्रही मागणी उत्तर नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे़ जायकवाडीला १ हजार ८४४ दशलक्ष घनफुट पाणी सोडल्यानंतर मुळा धरणात ८ हजार ३४२ दशलक्ष घनफुट पाणी असेल़ उपलब्ध पाणीसाठ्यातून बाष्पीभावन, पिण्याचे पाणी, टँकर, एमआयडीसी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाणी देऊन २ हजार ७९३ दशलक्ष घनफुट पाणीसाठा शेतीसाठी शिल्लक राहणार आहे़ शेतीसाठी एक आवर्तन सोडायचे झाल्यास ५ हजार ५०० दशलक्ष घनफुट पाणी आवश्यक आहे़ तुलनेत पाणीसाठा कमी असेल़ त्यामुळे ५० टक्के पाणी शेतीला देण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन आले़ परंतु त्यास वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे़ भंडारदरातून जायकवाडीसाठी ६़५० टीएमसी पाणी सोडण्यात येईल़ या धरणात एकूण ११ हजार ५२९ दशलक्ष घनफुट पाणीसाठा उपलब्ध होता़ त्यातून जायकवाडीला ६ हजार ५०० दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले़ परिणामी भंडारदरा धरणात ४ हजार ८३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असेल़ या पाणीसाठ्यातून बाष्पीभवन, टँकर, औद्योगिक वसाहतींसाठी एकूण ४ हजार ६३६ दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित आहे़ आरक्षण वगळल्यास धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नसल्याने उन्हाळ्यात भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)