शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा येणार ऐरणीवर

By admin | Updated: November 12, 2015 03:10 IST

उत्तर नगर जिल्ह्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी पुढे येत असून, दिवाळीनंतर शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत़ मुळा धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक आहे़

अहमदनगर : उत्तर नगर जिल्ह्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी पुढे येत असून, दिवाळीनंतर शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत़ मुळा धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक आहे़ पण, भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नसल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे़मुळा व भंडारदरा धरण उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरले आहे़ या दोन्ही धरणांमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील शेती फुलली,़ मात्र समन्यायी पाणीवाटप कायद्याने पाणी जायकवाडीला सोडण्यात आले़ प्राधिकरणाच्या या निर्णयाविरोधात उत्तरेतील साखर कारखाने व लोकप्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने याचिका फेटाळत मुळा व भंडादरातून आठ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय कायम ठेवला़ त्यानुसार मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यास प्रारंभ झाला़ मराठवाड्याला पाणी सोडण्यास उत्तर नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून विरोध झाला नाही़ मात्र जायकवाडीला सोडले तसे नगर जिल्ह्यातील शेतीला पाणी द्या, अशी आग्रही मागणी उत्तर नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे़ जायकवाडीला १ हजार ८४४ दशलक्ष घनफुट पाणी सोडल्यानंतर मुळा धरणात ८ हजार ३४२ दशलक्ष घनफुट पाणी असेल़ उपलब्ध पाणीसाठ्यातून बाष्पीभावन, पिण्याचे पाणी, टँकर, एमआयडीसी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाणी देऊन २ हजार ७९३ दशलक्ष घनफुट पाणीसाठा शेतीसाठी शिल्लक राहणार आहे़ शेतीसाठी एक आवर्तन सोडायचे झाल्यास ५ हजार ५०० दशलक्ष घनफुट पाणी आवश्यक आहे़ तुलनेत पाणीसाठा कमी असेल़ त्यामुळे ५० टक्के पाणी शेतीला देण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन आले़ परंतु त्यास वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे़ भंडारदरातून जायकवाडीसाठी ६़५० टीएमसी पाणी सोडण्यात येईल़ या धरणात एकूण ११ हजार ५२९ दशलक्ष घनफुट पाणीसाठा उपलब्ध होता़ त्यातून जायकवाडीला ६ हजार ५०० दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले़ परिणामी भंडारदरा धरणात ४ हजार ८३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असेल़ या पाणीसाठ्यातून बाष्पीभवन, टँकर, औद्योगिक वसाहतींसाठी एकूण ४ हजार ६३६ दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित आहे़ आरक्षण वगळल्यास धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नसल्याने उन्हाळ्यात भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)