शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

इस्रोच्या मोहिमेत मोलाचा वाटा

By admin | Updated: June 8, 2017 01:08 IST

भारताने आजवर अनेक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : भारताने आजवर अनेक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. सोमवारी (दि. ५) भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या माध्यमातून जीएसएलव्ही एमके-थ्री डी-१ प्रक्षेपकाच्या साह्याने जीसॅट १९ या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यात आजवरच्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहापैकी हा उपग्रह सर्वाधिक वजनाचा होता. त्या उपग्रहाचे काही भाग वालचंदनगर कंपनीने बनवले आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे वालचंदनगर कंपनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.भारतीय अवकाश संशोधन संस्थेने प्रक्षेपण केलेले व इस्रोने आजपर्यंत सोडलेल्या उपग्रहांपैकी या उपग्रहाचे वजन ३ हजार १३६ किलो असून यापुढे भारत या यशस्वी उड्डाणामुळे ४ हजार किलो वजनाचा उपग्रह सोडू शकणार आहे. सोमवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या अवकाश केंद्रातून सायंकाळी साडेपाच वाजता हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. या उपग्रहामुळे इंटरनेट सेवा वेगवान होण्यास मदत होणार आहे. या यशस्वी मोहिमेत मोठी प्रगती होणार आहे. याचा फायदा भविष्यात अशाच यानातून संशोधक मनुष्यही अवकाशात सोडणे भारताला सोपे जाणार आहे. या यानाला लागणाऱ्या भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. या यशस्वी उड्डाणासाठी वालचंदनगर कंपनीने एस २०० स्ट्रप आॅन मोटर केस हे महत्त्वाचे भाग बनवले आहेत. या यानाच्या दोन्ही बाजूला ते भाग बसवलेले असून यात हेड अँड सेग्मेंट मिडल सेग्मेंट व झोनल सेग्मेंट बसवण्यात आलेले आहे. यानाला दिशा देण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे.ही कंपनी १९०८ पासून कार्यरत असून ४५ वर्षांपासून भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहे. यापूर्वीच्या यशस्वी करण्यात आलेल्या मंगळायन मोहिमेत याच कंपनीच्या माध्यमातून यानाच्या मुख्य भागाची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे भारतीय संशोधनामुळे फेब्रुवारी महिन्यात जगातील सर्वांत मोठा उपग्रह सोडण्यात आला, त्यात १०४ उपग्रह सोडण्यात भारताने विश्वविक्रम केला त्या १०४ उपग्रहांत या वालचंदनगर कंपनीची मोलाची कामगिरी होती. त्यामुळे भारतीय उपग्रहात मोलाची कामगिरी करीत गेल्यामुळे कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लाई यांनी दिली.