शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

इस्रोच्या मोहिमेत मोलाचा वाटा

By admin | Updated: June 8, 2017 01:08 IST

भारताने आजवर अनेक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : भारताने आजवर अनेक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. सोमवारी (दि. ५) भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या माध्यमातून जीएसएलव्ही एमके-थ्री डी-१ प्रक्षेपकाच्या साह्याने जीसॅट १९ या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यात आजवरच्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहापैकी हा उपग्रह सर्वाधिक वजनाचा होता. त्या उपग्रहाचे काही भाग वालचंदनगर कंपनीने बनवले आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे वालचंदनगर कंपनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.भारतीय अवकाश संशोधन संस्थेने प्रक्षेपण केलेले व इस्रोने आजपर्यंत सोडलेल्या उपग्रहांपैकी या उपग्रहाचे वजन ३ हजार १३६ किलो असून यापुढे भारत या यशस्वी उड्डाणामुळे ४ हजार किलो वजनाचा उपग्रह सोडू शकणार आहे. सोमवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या अवकाश केंद्रातून सायंकाळी साडेपाच वाजता हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. या उपग्रहामुळे इंटरनेट सेवा वेगवान होण्यास मदत होणार आहे. या यशस्वी मोहिमेत मोठी प्रगती होणार आहे. याचा फायदा भविष्यात अशाच यानातून संशोधक मनुष्यही अवकाशात सोडणे भारताला सोपे जाणार आहे. या यानाला लागणाऱ्या भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. या यशस्वी उड्डाणासाठी वालचंदनगर कंपनीने एस २०० स्ट्रप आॅन मोटर केस हे महत्त्वाचे भाग बनवले आहेत. या यानाच्या दोन्ही बाजूला ते भाग बसवलेले असून यात हेड अँड सेग्मेंट मिडल सेग्मेंट व झोनल सेग्मेंट बसवण्यात आलेले आहे. यानाला दिशा देण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे.ही कंपनी १९०८ पासून कार्यरत असून ४५ वर्षांपासून भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहे. यापूर्वीच्या यशस्वी करण्यात आलेल्या मंगळायन मोहिमेत याच कंपनीच्या माध्यमातून यानाच्या मुख्य भागाची निर्मिती करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे भारतीय संशोधनामुळे फेब्रुवारी महिन्यात जगातील सर्वांत मोठा उपग्रह सोडण्यात आला, त्यात १०४ उपग्रह सोडण्यात भारताने विश्वविक्रम केला त्या १०४ उपग्रहांत या वालचंदनगर कंपनीची मोलाची कामगिरी होती. त्यामुळे भारतीय उपग्रहात मोलाची कामगिरी करीत गेल्यामुळे कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लाई यांनी दिली.