शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांचा खर्च ४४ हजार कोटींनी वाढला

By admin | Updated: April 14, 2016 01:08 IST

राज्यातील तब्बल ४०१ सिंचन प्रकल्पांमध्ये ४४ हजार ६१ इतका वाढीव खर्च झाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

मुंबई : राज्यातील तब्बल ४०१ सिंचन प्रकल्पांमध्ये ४४ हजार ६१ इतका वाढीव खर्च झाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. यातील बहुतेक किंमतवाढ ही आघाडी सरकारच्याच काळात झाली. या ४०१ प्रकल्पांची मूळ किंमत ही १९ हजार ८४५ कोटी रुपये इतकी होती. प्रत्यक्षात खर्च हा ६३ हजार ९०७ कोटी रुपये इतका झाला. याचा अर्थ ४४ हजार ६१ कोटी रुपये जादाचा खर्च झाला. या प्रकल्पांवर अजून ९६ हजार २१३ कोटी रुपयांचा खर्च करणे बाकी असल्याचे अहवालात म्हटले आहे. सिंचन प्रकल्पांची किंमत दुपटीहून अधिक वाढल्याचा आरोप होत आला आहे. कॅगच्या अहवालात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्यात एकूण ५१५ सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. त्यातील ८५ प्रकल्प हे ३० वर्षांपासून तर ६१ प्रकल्प २० वर्षांपासून प्रलंबित आहेत. १५ वर्षांपासून प्रलंबित प्रकल्पांची संख्या १०१ इतकी आहे. नियोजनाअभावी सिंचन प्रकल्पांची कशी वाट लागली याचे एक उदाहरण अहवालात नमूद करण्यात आले आहे. नंदुरबारमधील एक प्रकल्पाचे काम जमिनीची पूर्ण उपलब्धता नसतानाच सुरु करण्यात आले. १९८८ मध्ये त्याची किंमत ७ कोटी रुपये होती. २७ वर्षे झाली तरी हा प्रकल्प पूर्ण झालेला नसून त्यावर आतापर्यंत ८१ कोटी रुपये खर्च झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्य सरकारवरील एकूण कर्जाच्या बोजाचा विचार केला तर आज महाराष्ट्रातील प्रत्येक माणसावर २१ हजार १२५ रुपयांच्या कर्जाचा भार आहे. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या आज विधानसभेत सादर झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)कर्जाबाबत सांभाळून...राज्यावरील एकूण कर्जाच्या ५० टक्के कर्जाची पुढील सात वर्षांत परतफेड करावयाची आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पुढील काही वर्षांत मोठा बोजा पडेल. कॅगच्या अहवालानुसार २०१८ ते २०२० या कालावधीत ४२ हजार ५५२ कोटींची परतफेड करावी लागणार आहे. २०२० ते २०२२ दरम्यान जवळपास तेवढीच परतफेड राज्य सरकारला करावी लागणार आहे. त्यामुळे या वर्षांमध्ये मुदत संपेल अशी कोणतीही अतिरिक्त कर्जे राज्य सरकारने घेऊ नयेत आणि कर्ज परतफेडीचे धोरण विचारपूर्वक आखावे, असा सल्ला कॅगच्या अहवालात देण्यात आला आहे.