शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

अवजड वाहतुकीसाठी ४० हजार कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: October 3, 2016 05:03 IST

जेएनपीटी (उरण)- बुटीबोरी (नागपूर) या विशेष कॉरिडोरसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग- अवजड वाहनांच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी, जेएनपीटी (उरण)- बुटीबोरी (नागपूर) या विशेष कॉरिडोरसाठी केंद्र सरकार ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे उद्योग-व्यवसाय फास्ट ट्रॅकवर येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. अलिबाग येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहतूक होताना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्याचप्रमाणे, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यावर उपाययोजना म्हणून विशेष कॉरिडोर निर्माण करणे गरजेचे होते. यासाठी जेएनपीटी ते बुटीबोरी हा मार्ग विशेष कॉरिडोर म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे गीते यांनी सांगितले. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरला या नव्याने विकसित होणाऱ्या विशेष कॉरिडोरची कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने, उद्योग-व्यवसाय फास्ट ट्रॅकवर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या ‘सागरमाला’ प्रकल्पाअंतर्गत राज्यातील बंदरांचा विकास साधण्यासाठी रोहा-दिघी पोर्ट, जयगड-डिंगणी हे मार्ग रेल्वेने जोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, चिपळूण ते कराड या मार्गालाही फास्ट ट्रॅकवर आणण्यात येणार असल्याची माहिती गीते यांनी दिली.>किनारपट्टीवरील सुरक्षा देशासाठी सर्वाेच्च पाकिस्तानकडून गेली २० वर्षे छुपे हल्ले देशाने झेलले आहेत. उरी हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पलटवार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा देशासाठी सर्वाेच्च आहे. त्या दिशेने सुरक्षेची उपाययोजना केंद्र सरकार करीत आहे.