शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पुराव्यांची तपासणी करणार

By admin | Updated: July 29, 2016 03:37 IST

भ्रष्टाचारासंबंधी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर संबंधित मंत्र्यांनी पुराव्यानिशी उत्तरे दिली आहेत. तरीही या पुराव्यांची तपासणी केली जाईल. विरोधकांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास

मुंबई : भ्रष्टाचारासंबंधी विरोधकांनी केलेल्या आरोपांवर संबंधित मंत्र्यांनी पुराव्यानिशी उत्तरे दिली आहेत. तरीही या पुराव्यांची तपासणी केली जाईल. विरोधकांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित मंत्र्यावर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर बुधवारी विधान परिषदेतील तिढा सुटला.अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधकांनी नियम २६० अन्वये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान पुराव्यानिशी आरोप केल्याचा दावा विरोधकांनी केला होता. दोन दिवस चाललेल्या चर्चेला संबंधित मंत्र्यांनी उत्तरे दिली. त्यानंतर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा समारोप केला. मात्र, या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधकांनी मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करत सभागृहाचे कामकाज तीन दिवस रोखून धरले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे महत्वाची विधेयके, विनियोजन विधेयकावर चर्चा होवू शकली नाही. त्यामुळे गुरुवारी स्वत: मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्याचे आश्वासन दिल्याने या वादावर पडदा पडला. मुख्यमंत्री म्हणाले की, हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. मंत्र्यांवर आक्षेप घेण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडली. सभागृह नेत्यांनी उत्तर दिले. मात्र त्याने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे दोन-तीन दिवस कामकाज होऊ शकले नाही. सभागृहाचे कामकाज चालले पााहिजे. संसदीय लोकशाहीत चर्चेच्या माध्यमातून विषय पुढे गेले पाहिजेत आणि सरकारचीही तीच भूमिका आहे. मंत्र्यांनी आरोपांना पुराव्यांंनीशी उत्तर दिली असली तरी तो आमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय नाही. विरोधकांनी दिलेल्या पुराव्यांची तपासणी करु. पुराव्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्यास एक मिनिटाचाही वेळ लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर विरोधकांनी नरमाईची भूमिका स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली. अन् मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला खेदविधानसभेत बुधवारी विधेयकावरील चर्चेदरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याचे आज तीव्र पडसाद उमटले. संख्याबळाच्या जोरावर तुम्ही विधान परिषदेत कामकाज रोखून धरणार असाल, तर विधानसभेत आमचे बहुमत आहे. विधान परिषद बरखास्त करण्याचा अधिकार विधानसभेला आहे, असा गर्भित इशारा मुनगंटीवार यांनी दिला होता. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी हा मुद्दा उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज नियमानेच सुरु आहे. तरीही विधान परिषद बरखास्त करायचेच असेल तर जरुर करा. पण, बोलून सदस्यांची मने दुखवू नका, असे राणे म्हणाले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यामद्दल खेद व्यक्त केला.या सभागृहाला मोठी परंपरा आहे. ज्येष्ठांचे हे सभागृह असल्याने येथून मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी विविध संस्था, मतदारसंघ आणि राज्यपाल नियुक्त असे सदस्य येथे येतात. अर्थमंत्री विषयाच्या ओघात बोलून गेले तसे आमच्या कोणाच्याही मनात नाही. तरीही त्यांच्या वक्तव्याबद्दल खेद वक्त करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.