शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

दलित हत्याकांडाचा दोन दिवसांत तपास लावा

By admin | Updated: October 30, 2014 00:47 IST

जवखेडे येथील दलित हत्याकांडाची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून नऊ दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत, हे दुर्दैव आहे.

काँग्रेसची मागणी : पीडित कुटुंबाला पक्षाकडून आर्थिक मदत
पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडे येथील दलित हत्याकांडाची घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून नऊ दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत, हे दुर्दैव आहे. दोन दिवसांत घटनेचा तपास न लागल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे.
माणिकराव ठाकरे यांनी जवखेडे खालसा येथे बुधवारी भेट देऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केल़े ठाकरे म्हणाले, या घटनेने राज्याची मान खाली गेली आहे. एवढय़ा क्रूरपणो झालेल्या घटनेचा तपास तातडीने लागायला पाहिजे होता. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा तसेच त्यात कोणीही राजकारण आणू नये. दोन दिवसांत प्रकरणाचा तपास लागला नाही तर राज्यात उद्रेक होईल. त्यातील आंदोलनात काँग्रेस पक्ष सहभागी होईल. ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन काँग्रेस कमिटीतर्फे दोन लाख रुपयांची मदत जाधव कुटुंबीयांना देण्याची घोषणा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अरुण मुगदीया त्यांच्यासोबत होते.
बुधवारी दुपारी माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच घटनास्थळाची पाहणी केली़ विखे म्हणाले, संबंधित घटना राज्य तसेच जिल्ह्याच्या दृष्टीने निंदनीय आहे. पुरोगामी नगर जिल्ह्याला न शोभणारी ही घटना आहे. घटनेचा तपासासाठी पोलीस अधिका:यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
च्अहमदनगर : जवखेडे येथील दलित हत्याकांडाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असताना रोज नवा संदर्भ मिळत असल्याने पोलीस अधिकारी बुचकळ्य़ात पडले आहेत. 
च्पोलिसांसमोर रोज एक नवे कथानक येत आहे. त्यामुळे तपासाचा मार्ग बदलावा लागत आहे. दलित नेत्यांची आंदोलने, राजकीय नेत्यांच्या भेटी आणि हत्याकांडाचे प्रकरण थेट राज्यपालांर्पयत गेल्याने पोलिसांवरील दबाव वाढला आहे.
च्जाधव कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचे 22 ऑक्टोबरला उघडकीस आले होते. जातीयवाद, जमिनीचा वाद की अनैतिक संबंध, यापैकी नेमकी कोणती कारणो हत्येमागे आहेत याचा तपास सुरू आहे. रोज नव्या संशयितांचा शोध आणि त्यांची कसून चौकशी केली जात आहे. 
च्परिसरातील 7क् ते 8क् संशयितांची चौकशी झाली आहे. पोलिसांची विशेष पथके येथे तळ ठोकून आहेत. तिघांचा आधी गळा आवळून खून करण्यात आला. नंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून स्पष्ट झाले आहे. मात्र आरोपींना शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
 
च्सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. रोज संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. अद्याप आरोपीर्पयत पोहोचलेलो नाही. प्रकरणातील क्लिष्टता पाहता तपासाच्या अंतिम टप्प्यावर पोचण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी सांगितले.