शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

राष्ट्रसंतांच्या साहित्यातून मिळते रचनात्मक कार्याची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2015 02:44 IST

अकोल्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार संमेलनाचे थाटात उद्घाटन.

अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भरपूर साहित्य निर्माण केले; परंतु काही तथाकथित साहित्यिकांनी त्यांच्या साहित्याची नेहमीच अवहेलना केली; मात्र तुकडोजी महाराजांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. राष्ट्रसंतांचे साहित्य, विचार, तत्त्वज्ञान आज समाजाने स्वीकारले आहे. राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या साहित्यातून नेहमीच रचनात्मक कार्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे त्यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, मोझरीचे प्रचारप्रमुख बबनराव वानखडे यांनी शुक्रवारी येथे केले. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहातील साहित्यरत्न सुदामदादा सावरकर सभागृहात आयोजित ३ रे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे प्रा. डॉ. भास्करराव विघे होते. प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. गुरुदेव सेवा समितीचे सरचिटणीस जनार्दन बोथे, ज्येष्ठ प्रचारक ह.भ.प. आमले महाराज, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, ह.भ.प. तिमांडे महाराज, डॉ. सुभाष भडांगे, प्रगतिशील शेतकरी श्रीकृष्ण ठोंबरे, कृष्णा अंधारे, वंदन कोहाडे, उद्योजन एकनाथ दुधे, ज्येष्ठ प्रचारक सुधा जवंजाळ, मथुरा नारखेडे, रामदास देशमुख आदी उपस्थित होते.

खासदार-आमदारांचे वेतन, भत्ते बंद करा!

शेतकरी नापिकी, दुष्काळासारख्या परिस्थितीला तोंड देत आहे. त्यांना मदत करण्याऐवजी शासन कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करून पगारवाढ देत आहे; परंतु शेतकर्‍यांच्या मालाला भाववाढ देत नाही. खासदार-आमदारांचे वेतन, भत्ते वाढविण्यात येतात. मात्र, शेतकर्‍यांना कर्जमाफी देत नाही. खासदार-आमदारांचे वेतन आधी बंद केले पाहिजे, अशी मागणी कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांनी केली.