शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

गुन्ह्याच्या कबुलीसाठी अमानुष छळ

By admin | Updated: May 27, 2014 05:36 IST

गोध्रा व पांड्यातील स्फोटांपैकी एक गुन्हा कबूल करण्यासाठी गुजरात पोलिसांकडून अनन्वित व अमानवी छळ करण्यात आला

मुंबई : गोध्रा व पांड्यातील स्फोटांपैकी एक गुन्हा कबूल करण्यासाठी गुजरात पोलिसांकडून अनन्वित व अमानवी छळ करण्यात आला. मात्र देशाच्या घटनेवर विश्वास असल्याने अत्याचार होऊनही त्यांच्या दबावाला बळी पडलो नाही. आपल्यावर अन्याय करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करून आपल्याला सन्मानाने जगण्याची संधी द्यावी, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधितांना आदेश द्यावेत, अशा शब्दांत अक्षरधाम स्फोटाच्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झालेल्या ५ तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या अनेक वर्र्षांपासून गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अल्ताफ हुसेन अकबर, आदम भाई सुलेमान अजमेरी, महंमद सुलतान, हनीफ शेख अब्दुल कय्युम, अब्दुल मियां मुसरी व शान मिया या सहा जणांना १६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सोडले. यापैकी अजमेरी, कय्युम मुफ्ती व शान यांना खालच्या कोर्टाने फाशीची तर अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी शान वगळता अन्य सर्वांनी जमात-ए-उलेमा हिंदच्या वतीने मुंबईत सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या झालेल्या छळाची माहिती दिली. जमात-ए-उलेमा हिंदच्या लीगल सेलचे सचिव गुलझार आजमी, अ‍ॅड. खालिद शेख, एजाज कुरेशी यांनी ठरावीक समुदायातील निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करून आयुष्यातून उठविले जात असल्याचा आरोप केला. आता न्यायदेवतेने त्यांना निर्दोष ठरविल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार्‍यांवर कडक कारवाई केली जावी, त्याचप्रमाणे या तरुणांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी तातडीने सरकारने सानुग्रह अनुदान द्यावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)