शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

गुन्ह्याच्या कबुलीसाठी अमानुष छळ

By admin | Updated: May 27, 2014 05:36 IST

गोध्रा व पांड्यातील स्फोटांपैकी एक गुन्हा कबूल करण्यासाठी गुजरात पोलिसांकडून अनन्वित व अमानवी छळ करण्यात आला

मुंबई : गोध्रा व पांड्यातील स्फोटांपैकी एक गुन्हा कबूल करण्यासाठी गुजरात पोलिसांकडून अनन्वित व अमानवी छळ करण्यात आला. मात्र देशाच्या घटनेवर विश्वास असल्याने अत्याचार होऊनही त्यांच्या दबावाला बळी पडलो नाही. आपल्यावर अन्याय करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करून आपल्याला सन्मानाने जगण्याची संधी द्यावी, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधितांना आदेश द्यावेत, अशा शब्दांत अक्षरधाम स्फोटाच्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झालेल्या ५ तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या अनेक वर्र्षांपासून गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अल्ताफ हुसेन अकबर, आदम भाई सुलेमान अजमेरी, महंमद सुलतान, हनीफ शेख अब्दुल कय्युम, अब्दुल मियां मुसरी व शान मिया या सहा जणांना १६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सोडले. यापैकी अजमेरी, कय्युम मुफ्ती व शान यांना खालच्या कोर्टाने फाशीची तर अन्य तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी शान वगळता अन्य सर्वांनी जमात-ए-उलेमा हिंदच्या वतीने मुंबईत सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या झालेल्या छळाची माहिती दिली. जमात-ए-उलेमा हिंदच्या लीगल सेलचे सचिव गुलझार आजमी, अ‍ॅड. खालिद शेख, एजाज कुरेशी यांनी ठरावीक समुदायातील निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करून आयुष्यातून उठविले जात असल्याचा आरोप केला. आता न्यायदेवतेने त्यांना निर्दोष ठरविल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार्‍यांवर कडक कारवाई केली जावी, त्याचप्रमाणे या तरुणांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी तातडीने सरकारने सानुग्रह अनुदान द्यावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)