शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

माहिती पुस्तिका शुक्रवारपासून मिळणार

By admin | Updated: April 30, 2016 01:46 IST

अकरावीच्या कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची माहिती देणाऱ्या पुस्तिकांच्या छपाईचे काम वेगाने सुरू आहे.

पुणे : केंद्रीय पद्धतीने देण्यात येणाऱ्या अकरावीच्या कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची माहिती देणाऱ्या पुस्तिकांच्या छपाईचे काम वेगाने सुरू आहे. येत्या ६ मेपासून या पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष व विभागीय उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेचे काम केंद्रीय प्रवेश समितीमार्फत केले जात आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी समितीच्या वतीने सहकारनगर येथील मुक्तांगण आवारात बैठक आयोजित करण्यात आली होती. सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला क्षेत्रप्रमुख, केंद्रप्रमुख, संपर्कप्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.बैठकीत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल)च्या अधिकाऱ्यांनी अकरावी प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘भाग एक’मध्ये आॅनलाइन प्रवेश अर्ज कसा भरला जातो, याचे प्रात्यक्षिक दाखविले. अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी सुमारे ३०० हून जास्त कनिष्ठ महाविद्यालयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. या महाविद्यालयांमधील विविध विद्या शाखांसाठी ही केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. व्यवस्थापन कोट्यासह अल्पसंख्याक, शाळाअंतर्गत असे सर्व प्रवेश आॅनलाइन पद्धतीने करणे बंधनकारक असणार आहे. कोणत्याही महाविद्यालयाला एकही प्रवेश आॅफलाइन पद्धतीने करता येणार नाही. प्रवेशित सर्व कोट्यांची यादी संबंधित महाविद्यालयांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असणार आहे. या बैठकीबाबत राऊत म्हणाल्या, एमकेसीएलसोबत केंद्रीय प्रवेश समितीचा करार झाला आहे. त्यानुसार अकरावी प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेला ‘भाग एक’ प्रवेश अर्ज भरणे बंधनकारक असणार आहे. त्यासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आॅनलाइन प्रवेश माहिती पुस्तिका घेणे बंधनकारक आहे. या पुस्तिकेची किंमत शंभर रुपये असणार आहे. सुमारे १ लाख १० हजार प्रवेश माहिती पुस्तिकांची सध्या छपाई सुरू आहे. या पुस्तिकांचे ६ मेपासून वितरण सुरू करण्यात येणार आहे.>पालक व विद्यार्थ्यांसाठी निकालानंतर उद्बोधन वर्गआॅनलाइन प्रवेशाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर पालक-विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून उद्बोधन वर्ग घेतले जाणार आहेत. यासंदर्भात सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठकही घेतली जाणार आहे. दहावी अनुत्तीर्ण झालेल्यांची पुनर्परीक्षा जुलैमध्ये आहे. तीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही अकरावी प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जातील, अशी माहिती रामचंद्र जाधव यांनी दिली.