शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

‘उद्योग, गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर वन’

By admin | Updated: November 20, 2015 01:53 IST

भारतात येणाऱ्या थेट परदेशी गुंतवणुकीपैकी ३५ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात केली जाते. परदेशी गुंतवणुकीसाठी आणि उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला सर्वात जास्त

मुंबई : भारतात येणाऱ्या थेट परदेशी गुंतवणुकीपैकी ३५ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात केली जाते. परदेशी गुंतवणुकीसाठी आणि उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला सर्वात जास्त पसंती दिली जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईत झालेल्या चौथ्या चीन-भारत फोरममध्ये बोलताना केले. यावेळेस खा. तरुण विजय, कर्नाटकचे उद्योगमंत्री आर.व्ही. देशपांडे, चायना-इंडिया फ्रेंडशिप असोसिएशनचे अध्यक्ष जिआंग झेंगुहा, चीनचे भारतातील राजदूत ही ली यूचेंग आणि इंटरनॅशनल बिझनेस लिंकेज फोरमचे (आयबीएलएफ) अध्यक्ष राजीव पोदार उपस्थित होते.देसाई पुढे म्हणाले, ऊर्जा, बांधकाम तसेच ई- कॉमर्स क्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्याची संधी दोन्ही देशांना आहे. भारताच्या स्मार्ट सिटीसारख्या महत्वाकांक्षी योजनांमध्येही चीन गुंतवणूक करु शकतो. देशाच्या एकूण निर्यातीपैकी ३० टक्के निर्यातही येथून होते.रोज चार हजार स्टार्ट-अप्सची नोंदणी : चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर सध्या तात्पुरता अडथळा आला असला तरी ती सक्षम आणि शाश्वत असल्याचे मत चीनचे भारतातील राजदूत ही ली यूचेंग यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, सध्या चीनमध्ये दररोज चार हजार नव्या स्टार्ट अप्सची नोंदणी होत आहे आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये चीनचे नाव अजूनही आहे. भारतात गेल्या वर्षभरात उद्योगाचे चित्र बदलल्याचे दिसत आहे.