शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरची इंद्रध्वज गुढी

By admin | Updated: June 1, 2015 02:55 IST

स्मशानभूमीत नुकत्याच दहन केलेल्या जागेवर ही पूजा केली जाते. ती जागा शेणाने सारवली जाते. या जागेत १२ महिन्यांचे १२, चार दिशेचे ४, राजा व प्रजाभाग २ असे एकूण १८ छोटे खड्डे केले

विजय गायकवाडरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरात गेल्या $४०० वर्षांपेक्षा जास्त काळापासून इंद्रध्वज गुढी उभारण्याची परंपरा आहे. यावरूनच येणाऱ्या वर्षाचे पिकांसह पाऊसपाण्याचे आडाखे बांधले जातात. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी येथील स्मशानभूमीत ही गुढी उभारली जाते. मराठी माणसाच्या नववर्षाच्या येणाऱ्या वर्षभरातील पीकपाणी कसे राहील? कोणत्या वस्तूची तेजी-मंदी राहील? हा काळ राज्यकर्ते व प्रजेसाठी कसा राहील, असे भविष्य यावरून वर्तविण्यात येते. पोलीस पाटलांसह माली पाटील, पुरोहित व गावकरी मंडळी शहराच्या पश्चिम दिशेला असलेल्या स्मशानभूमीत जमा होतात. स्मशानभूमीत नुकत्याच दहन केलेल्या जागेवर ही पूजा केली जाते. ती जागा शेणाने सारवली जाते. या जागेत १२ महिन्यांचे १२, चार दिशेचे ४, राजा व प्रजाभाग २ असे एकूण १८ छोटे खड्डे केले जातात. यामध्ये प्रत्येकी २१-२१ ज्वारीचे दाणे टाकले जातात. नंतर त्यावर रुईच्या पानावर महिन्याचे नाव लिहून महिन्याच्या व इतर खड्ड्यांवर ठेवली जातात. या जागेच्या उत्तर दिशेला ज्वारीची रास घालून त्यावर मातीची ३ मडकी एकावर एक पाण्याने भरून ठेवली जातात. त्या मडक्याच्या तोंडावर रुईची पाने ठेवली जातात. ही विधिवत पूजा पोलीस पाटील व माली पाटील यांच्या हस्ते परंपरेने चालू आहे. या पूजेला इंद्रध्वज पूजन म्हणतात. या इंद्रध्वजाची रात्रभर राखण केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी माली पाटील यांच्या घरून सप्त धान्याचा नैवेद्य आणण्यात येतो. कावळा नैवेद्य घेऊन ज्या दिशेने जातो त्या दिशेला दुष्काळ राहील असे समजले जाते, तर इतर दिशेला मध्यकाळ राहील असे मानतात. म्हणजेच पर्जन्यमान व पीकपाणी चांगले राहील असे गृहीत धरले जाते. आदल्या दिवशी झाकून ठेवलेली सर्व खड्ड्यांवरील रुईची पाने काढली जातात. ज्या महिन्याच्या वरील पाने ओली निघतात त्या महिन्यात पाऊस चांगला, तर पाने कोरडी निघतात त्या महिन्यात मध्यम किंवा कमी स्वरूपाचा पाऊस पडेल असा अनुमान काढण्यात येतो. नंतर प्रत्येक महिन्याच्या खड्ड्यातील ज्वारीचे दाणे मोजले जातात. हे दाणे रात्रीतून कमी वा अधिक होतात असे जाणकार सांगतात. ज्या महिन्यातील दाणे जास्त त्या महिन्यात उद्योग, व्यवसाय, व्यापारात मंदी, तर दाणे कमी त्या महिन्यात तेजी असे समजले जाते. ज्या दिशेच्या खड्ड्यात दाणे वाढतात त्या दिशेला स्वस्ताई, तर ज्या दिशेला दाणे कमी होतात तिकडे महागाई असते. राजभागातील दाणे घटल्यास राज्यकर्त्यांना, राजसत्तेला अनिष्ट, प्रजाभागाचे दाणे घटल्यास प्रजेला अनिष्ट समजले जाते.