शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे - सरसंघचालक मोहन भागवत

By admin | Updated: October 22, 2015 12:03 IST

गात भारताची प्रतिष्ठा वाढली असून अनेक देश आता भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक आहेत असे सांगत सरसंघचालक मोहन भागवतांनी मोदी सरकारचे कौतुक केल.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २२ - जगात भारताची प्रतिष्ठा वाढत असून अनेक देश आता भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक आहेत. दोन वर्षांपूर्वी देशात निराशेचं वातावरण होतं, मात्र आता उत्साहाचे वातावरण असून काही तरी चांगलं घडेल अशी आशा आता निर्माण झाल्याचे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले. मात्र सर्वांगिण विकासासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहता येणार नाही. सरकारमुळेच देशाची प्रगती होते असे नव्हे, त्यासाठी जनतेनेही सहभागी व्हायला हवे आणि परंपरेने मिळालेली अर्थव्यवस्था सुधारण्यास वेळ लागणारच, असे खडे बोल त्यांनी विरोधकांना सुनावले. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज ९० वा वर्धापनदिन असून रेशीमबागेत विजयादशमीनिमिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संघाच्या गणवेशात कार्यक्रमाला हजेरी लावली.
इतर देशांशी भारताचे चांगले संबंध निर्माण झाले आहेत, देशात उत्साहाचे वातावरण आहे. जगाला भारताकडून नेतृत्वाची अपेक्षा आहे. सरकार स्व:तच्या हितासोबत विश्वाच्या हिताचाही विचार करत आहे. जगात कोणतीही आपत्ती आली तर आपण त्यांच्या मदतीसाठी धावून जातो असे सांगत त्यांनी भूकंपग्रस्त नेपाळला भारताने केलेल्या मदतीचा उल्लेख करत सरकारचे कौतुक केले. स्वच्छ भारत, जन-धन, डिजीटल इंडिया, गॅस सबसिडी सोडणे अशा विविध योजना चांगल्या असून, त्या अमलात आणण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे ते म्हणाले.
केवळ भौतिक विकास उपयोगी नसून अध्यात्मिक विकासही महत्वाचा आहे. आपली भारतीय संस्कृती समृद्ध आहे, परदेशी संस्कृतीचे अंधानुकरण करण्याची गरज नाही असा सल्ला त्यांनी दिला. धर्मातूनच त्याग आणि संयमाची शक्ती मिळते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. विविधतेत एकता शिकवणाऱ्या हिंदू संस्कृतीमुळेच आपला देश अखंड असल्याचे सांगत छोट्या-मोठ्या घटनांनी आपल्या संस्कृतीला, अखंडतेला धक्का बसत नाही असे सांगत त्यांनी दादरी हत्याकांडावर अप्रत्यक्षपणे सूचक भाष्य केले.
वाढत्या लोकसंख्येनुसार कार्यवाही केली पाहिजे असे सांगत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकभावना बनवावी लागेल असेही ते म्हणाले.  देशातील निवडणूक व्यवस्था बदलण्याची गरज आहे. निवडणूक व्यवस्था भ्रष्टाचाराचे कुरण बनायला नको, लोकप्रतिनिधी ख-या अर्थाने लोकांसाठी निवडून येतील अशी व्यवस्था हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सीमारेषेवर पाकिस्तानची शत्रूबुद्धी आणि चीनच्या विस्तारबुद्धीचा आपल्याला सामना करावा लागत आहे. सामेपलीकडे इसिस सारख्या दहशतवादी संघटनाचा धोका असतानाच आपल्यासमोर देशांर्गत दहशतवादाचेही संकट उभे आहे. अशावेळी शाती, सुरक्षा व सुशासन ठेवण्यात सरकारची खूप महत्वाची भूमिका असते असे भागवत यावेळी म्हणाले.
देशाच्या विकासासाठी एकता आणि संवाद आवश्यक आहेत, मतभेद असले तरी ते चर्चेने सोडवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि समाज एकत्र आला तरच भाग्य बदलू शकतं, असे सरसंघचालकांनी सांगितले.