शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

भारतीय समाज नेहमीच सहिष्णू - जावेद अख्तर

By admin | Updated: November 29, 2015 02:39 IST

भारतीय समाज नेहमीच सहिष्णू होता आणि आजही आहे. परंतु आपण काही वेळा टोकाच्या भूमिका घेतो. मुळातच सत्य याच दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक जावेद

पुणे : भारतीय समाज नेहमीच सहिष्णू होता आणि आजही आहे. परंतु आपण काही वेळा टोकाच्या भूमिका घेतो. मुळातच सत्य याच दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी आहे, असे मत ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी येथे केले.भारतातील चित्रपट निर्मितीच्या कलेविषयी चर्चा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आणि दिग्दर्शक राजू हिरानी यांनी संवाद साधला. पुण्यापासून सुरू झालेला हा कार्यक्रम इतर शहरांत देखील होणार आहे. चित्रपट निर्मितीमधील उत्कृष्टता याविषयी विविध मान्यवर मत मांडणार आहेत.सेन्सॉर बोर्डबद्दल बोलताना अख्तर म्हणाले, एकंदरच या बोर्डामध्ये उच्च गुणवत्ता असलेली माणसे असणे महत्त्वाचे आहे.उत्कृष्ट चित्रपटाची व्याख्या सांगताना अख्तर म्हणाले, परिपूर्ण चित्रपटाची अशी कोणतीही व्याख्या नसते. चित्रपट चांगला झाल्यानंतरच तुम्हाला ते समजते. याच अनिश्चिततेमुळे चित्रपट निर्मिती अधिक रंजक असते. राजू हिरानी म्हणाले, की चित्रपटाचा कोणताही फॉर्म्युला नसतो. जर एखादा फॉर्म्युला वारंवार वापरला तर धोकादायक ठरतो. त्यामुळे अभिनव चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.एफटीआयआयच्या प्रश्नावर बोलताना राजू हिरानी म्हणाले, विद्यार्थी आणि प्रशासन या दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न मी करीत आहे. त्यामुळे त्यावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही. (प्रतिनिधी)दुर्लक्ष केले पाहिजेआमिर खानच्या वक्तव्यावर उठलेल्या वादळाबाबत हिरानी म्हणाले की,आमिर खानने स्वत:हून येऊन पत्रकार परिषद घेतली नव्हती. त्याच्या मुलाखती दरम्यान तो बोलला. ती मुलाखत जर नीट पाहिली तर त्याने निरागसपणे उत्तर दिले आहे. खरे तर या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे होते. त्यावर अधिक चर्चा करण्यापेक्षा त्यावर पडदा टाकणे गरजेचे आहे.