शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘याच पिढीत भारताला प्रगत राष्ट्र बनविणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 02:10 IST

याच पिढीमध्ये भारताला प्रगत राष्ट्र बनविणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील

पनवेल (रायगड) : याच पिढीमध्ये भारताला प्रगत राष्ट्र बनविणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथे केले. पंतप्रधानांच्या हस्ते खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहत परिसरामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ सिक्युरिटी मार्केटचे (सेबी-एनआयएसएम) उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. देशाची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून, मोठ्या प्रमाणावर ती विस्तारत आहे. आर्थिक वृत्तपत्र वाचताना आता समाधानकारक चित्र दिसते. मी नव्या उद्योजकांच्या यशोगाथा वाचतो तेव्हा स्टार्टअपचा उपक्रम यशस्वी होत असल्याचे समाधान मिळते, असे पंतप्रधान म्हणाले.स्कील इंडियाच्या माध्यमातून देशातील उत्पादकता वाढविण्यासाठी युवकांची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, तरुणांना कौशल्यशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आव्हान स्वीकारण्यास ते तयार असले पाहिजेत. तसेच जनहितार्थ तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्टसाठी बाजारातून भांडवल उभे केले पाहिजे, असे मत मोदींनी व्यक्त केले.यशाचे मोजमाप करायचे असेल तर दलाल स्ट्रीटवर नव्हे, तर गावांमध्ये किती प्रभाव पडला हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मोदी म्हणाले, आर्थिक बाजारपेठेच्या शिक्षणामध्ये एनआयएसएम महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. मात्र भांडवली गुंतवणुकीपासून सामान्य जनता दूर आहे; त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर दूरदर्शी पायाभूत सुविधांवर भांडवली बाजारातील पैसा खर्च व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.मजबूत आणि निर्माणक्षम अर्थव्यवस्थेसाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. देशहितासाठी जे जे निर्णय कठोरपणे घ्यावे लागतील ते ते घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या वेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, सेबीचे चेअरमन यू.के. सिन्हा तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सुरक्षा यंत्रणांचे पदाधिकारी, सेबीचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)एनआयएसएमचे होणार विद्यापीठयेत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एनआयएसएमचे विद्यापीठ करण्याचा प्रस्ताव घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.