शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘याच पिढीत भारताला प्रगत राष्ट्र बनविणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 02:10 IST

याच पिढीमध्ये भारताला प्रगत राष्ट्र बनविणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील

पनवेल (रायगड) : याच पिढीमध्ये भारताला प्रगत राष्ट्र बनविणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथे केले. पंतप्रधानांच्या हस्ते खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहत परिसरामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ सिक्युरिटी मार्केटचे (सेबी-एनआयएसएम) उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. देशाची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून, मोठ्या प्रमाणावर ती विस्तारत आहे. आर्थिक वृत्तपत्र वाचताना आता समाधानकारक चित्र दिसते. मी नव्या उद्योजकांच्या यशोगाथा वाचतो तेव्हा स्टार्टअपचा उपक्रम यशस्वी होत असल्याचे समाधान मिळते, असे पंतप्रधान म्हणाले.स्कील इंडियाच्या माध्यमातून देशातील उत्पादकता वाढविण्यासाठी युवकांची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, तरुणांना कौशल्यशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आव्हान स्वीकारण्यास ते तयार असले पाहिजेत. तसेच जनहितार्थ तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्टसाठी बाजारातून भांडवल उभे केले पाहिजे, असे मत मोदींनी व्यक्त केले.यशाचे मोजमाप करायचे असेल तर दलाल स्ट्रीटवर नव्हे, तर गावांमध्ये किती प्रभाव पडला हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मोदी म्हणाले, आर्थिक बाजारपेठेच्या शिक्षणामध्ये एनआयएसएम महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. मात्र भांडवली गुंतवणुकीपासून सामान्य जनता दूर आहे; त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर दूरदर्शी पायाभूत सुविधांवर भांडवली बाजारातील पैसा खर्च व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.मजबूत आणि निर्माणक्षम अर्थव्यवस्थेसाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. देशहितासाठी जे जे निर्णय कठोरपणे घ्यावे लागतील ते ते घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या वेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, सेबीचे चेअरमन यू.के. सिन्हा तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सुरक्षा यंत्रणांचे पदाधिकारी, सेबीचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)एनआयएसएमचे होणार विद्यापीठयेत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एनआयएसएमचे विद्यापीठ करण्याचा प्रस्ताव घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.