शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारत विश्वमांगल्याची राजधानी व्हावी

By admin | Updated: December 25, 2016 01:24 IST

देशाच्या सीमेवर भाषा, धर्म, पंथ यांना भेदून सैनिक आपल्या जीव धोक्यात घालून देशाचे व समाजाचे रक्षण करीत आहेत. सैनिकांची ही भावना विश्वमांगल्याची आहे.

नागपूर : देशाच्या सीमेवर भाषा, धर्म, पंथ यांना भेदून सैनिक आपल्या जीव धोक्यात घालून देशाचे व समाजाचे रक्षण करीत आहेत. सैनिकांची ही भावना विश्वमांगल्याची आहे. परंतु समाजानेही सैनिकांचे समर्पण लक्षात घेतले पाहिजे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती समाजात सन्मानाची भावना रुजविण्याचे काम झाल्यास, भारत विश्वमांगल्याची राजधानी होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.देशरक्षक आणि धर्मरक्षक यांच्या प्रेरणा संगमातून राष्ट्रक्रांतीचे बीजारोपण करणारा प्रेरणा संगम हा कार्यक्रम धर्मसंस्कृती महाकुंभात आयोजित केला होता. सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती आदर व्यक्त करण्यास एक प्रेरणादायी संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. ज्योतिषपिठाधीश्वर शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सरसंघचालक मोहन भागवत होते. त्याचबरोबर सेनेचे जनरल अ‍ॅडमिरल निर्मलचंद वीज, लेफ्टनन्ट जनरल सय्यद अता होस्नेन, हवाई दलाचे एअर मार्शल भूषण गोखले, लेफ्ट. कर्नल जी.एस. जॉली, लेफ्ट. कर्नल सुनील देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात १५० वीरपत्नी, वीरमातांचा सत्कार तसेच विशेष पदक प्राप्त अधिकारी आणि शौर्य गाजविलेल्या सैनिकांचा गौरव या करण्यात आला. (प्रतिनिधी)सीमेवर बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना सन्मान, सुविधा मिळावी, सैनिकांचा आदर देश व समाजाने कायम ठेवावा. समाजाची सैनिकांप्रती कर्तव्याची भावना असल्याची जाणीव व्हावी, अशी समाज व सरकारकडून अपेक्षा आहे. - जनरल अ‍ॅडमिरल निर्मलचंद वीजमहाराष्ट्रात गेल्या वर्षात ८५०० भागवत कथा संपन्न झाल्या. यात कथाकार व आयोजकांचा सन्मान झाला. परंतु ज्या परिसरात हे आयोजन झाले, त्या परिसरातील सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान झाला असता, तर एक मोठे कार्य घडले असते. ही भावना समाजात निर्माण होणे गरजेचे आहे.- आचार्य जितेंद्रनाथ महाराजसंत व सैनिक दोन्ही संन्यासी आहेत. दोघेही देशाचे संरक्षक आहे. त्यामुळे संत आणि सैनिकांबद्दल समाजामध्ये आदराची भावना असणे गरजेचे आहे. विश्वमांगल्याच्या भावनेतून हे कार्य घराघरात पोहचविण्याचे कार्य संत संप्रदायाबरोबरच आता स्वयंसेवकांनीही हाती घेतले आहे. - ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्यस्वामी वासुदेवानंद सरस्वती