शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

भारत विश्वमांगल्याची राजधानी व्हावी

By admin | Updated: December 25, 2016 01:24 IST

देशाच्या सीमेवर भाषा, धर्म, पंथ यांना भेदून सैनिक आपल्या जीव धोक्यात घालून देशाचे व समाजाचे रक्षण करीत आहेत. सैनिकांची ही भावना विश्वमांगल्याची आहे.

नागपूर : देशाच्या सीमेवर भाषा, धर्म, पंथ यांना भेदून सैनिक आपल्या जीव धोक्यात घालून देशाचे व समाजाचे रक्षण करीत आहेत. सैनिकांची ही भावना विश्वमांगल्याची आहे. परंतु समाजानेही सैनिकांचे समर्पण लक्षात घेतले पाहिजे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती समाजात सन्मानाची भावना रुजविण्याचे काम झाल्यास, भारत विश्वमांगल्याची राजधानी होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.देशरक्षक आणि धर्मरक्षक यांच्या प्रेरणा संगमातून राष्ट्रक्रांतीचे बीजारोपण करणारा प्रेरणा संगम हा कार्यक्रम धर्मसंस्कृती महाकुंभात आयोजित केला होता. सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती आदर व्यक्त करण्यास एक प्रेरणादायी संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. ज्योतिषपिठाधीश्वर शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सरसंघचालक मोहन भागवत होते. त्याचबरोबर सेनेचे जनरल अ‍ॅडमिरल निर्मलचंद वीज, लेफ्टनन्ट जनरल सय्यद अता होस्नेन, हवाई दलाचे एअर मार्शल भूषण गोखले, लेफ्ट. कर्नल जी.एस. जॉली, लेफ्ट. कर्नल सुनील देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात १५० वीरपत्नी, वीरमातांचा सत्कार तसेच विशेष पदक प्राप्त अधिकारी आणि शौर्य गाजविलेल्या सैनिकांचा गौरव या करण्यात आला. (प्रतिनिधी)सीमेवर बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना सन्मान, सुविधा मिळावी, सैनिकांचा आदर देश व समाजाने कायम ठेवावा. समाजाची सैनिकांप्रती कर्तव्याची भावना असल्याची जाणीव व्हावी, अशी समाज व सरकारकडून अपेक्षा आहे. - जनरल अ‍ॅडमिरल निर्मलचंद वीजमहाराष्ट्रात गेल्या वर्षात ८५०० भागवत कथा संपन्न झाल्या. यात कथाकार व आयोजकांचा सन्मान झाला. परंतु ज्या परिसरात हे आयोजन झाले, त्या परिसरातील सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान झाला असता, तर एक मोठे कार्य घडले असते. ही भावना समाजात निर्माण होणे गरजेचे आहे.- आचार्य जितेंद्रनाथ महाराजसंत व सैनिक दोन्ही संन्यासी आहेत. दोघेही देशाचे संरक्षक आहे. त्यामुळे संत आणि सैनिकांबद्दल समाजामध्ये आदराची भावना असणे गरजेचे आहे. विश्वमांगल्याच्या भावनेतून हे कार्य घराघरात पोहचविण्याचे कार्य संत संप्रदायाबरोबरच आता स्वयंसेवकांनीही हाती घेतले आहे. - ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्यस्वामी वासुदेवानंद सरस्वती