शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

भारत is my country...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 01:19 IST

भारत माझा देश आहे... (फक्त ही भावना तेव्हाच जागी होते, जेव्हा बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिक आपल्या जवानांना हकनाक गोळ्या घालतात किंवा आपण एखादी क्रिकेटची मॅच हरतो

- प्रसाद ओकभारत माझा देश आहे... (फक्त ही भावना तेव्हाच जागी होते, जेव्हा बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिक आपल्या जवानांना हकनाक गोळ्या घालतात किंवा आपण एखादी क्रिकेटची मॅच हरतो आणि कोणीतरी 'भारत देशी बार'मधे बसून खूप वैतागलेला असतो... तेव्हाच हं... )सारे भारतीय माझे बांधव आहेत... (तरी हिंदू-मुस्लीम दंगे होतात, तेव्हा आधी मी माझ्या घरच्या बांधवांनाच वाचवतो आणि परक्या बांधवांना घरात येऊन शिव्या घालतो.)माझ्या देशावर माझे प्रेम आहे...(पण प्रेमासाठी असलेल्या इतर सगळ्या गोष्टींमधून मला वेळ मिळेल तेव्हा हं.) माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. (म्हणूनच दहीहंडीच्या दिवशी दह्याऐवजी दारू ढोसून आम्ही आमच्याच इगोची मटकी फोडतो. गणपतीच्या मांडवाखाली ‘बसतो’ आणि ‘चकणा’ म्हणून मोदक खातो. होळी रंगपंचमीला जगात फक्त 'काळा'च रंग शिल्लक असावा, अशा मनोवृत्तीने वागतो. क्रिसमसला त्यांच्याकडे संता असला, तरी आपल्याकडे संत आहेत आणि काही क्लॉज घालून दिलेत हे विसरून आपण ‘रम’माण होतो आणि दिवाळीत नको त्या 'दारू'ची आतषबाजी करतो.)मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन, प्रत्येकाशी सौजन्याने वागेन...(फक्त हे सगळे जेव्हा माझ्या मनासारखे वागायची मला परवानगी देतील तेव्हाच आणि गुरुजन असताना पालक का शिकवतात किंवा आईवडील असताना गुरुजन कशाकरिता माया अन् प्रेम दाखवतात... किंवा प्रत्येक वडीलधारा माणूस आगाऊ नसतो किंवा प्रत्येक आगाऊ माणूस वडीलधाराही नसतो. अशा सगळ्या शंका माझ्या मनातून दूर होतील तेव्हाच हं)माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे...(फक्त लाच घेताना किंवा भ्रष्टाचार करताना आपण कोणाला किंवा कोणी आपल्याला पाहिले तर गुपचूप बसणे, सांभाळून घेणे... म्हणजे सो कोल्ड निष्ठा राखणे नाही, हे जेव्हा मला किंवा समोरच्याला कळेल तेव्हाच हं...)त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे...( जुगार, मटका, लॉटरीमुळे... ‘झालं कल्याण’ असे आपण म्हणतो, ते हे कल्याण नव्हे आणि... सुरू केली तेव्हा पंधरा-वीस दिवसांत एखादा पेग घ्यायचा, आता बसल्याजागी रोज दीड खंबा संपवतो... ही ती 'समृद्धी' नव्हे... हे जेव्हा कळायचे त्याला कळेल तेव्हाच हं...)असो...कंसा बाहेर माझा देश बोलतोय...आणि कंसात माझी कंट्री बोलतेय...

(लेखक प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आहेत.)