शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

भारत is my country...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 01:19 IST

भारत माझा देश आहे... (फक्त ही भावना तेव्हाच जागी होते, जेव्हा बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिक आपल्या जवानांना हकनाक गोळ्या घालतात किंवा आपण एखादी क्रिकेटची मॅच हरतो

- प्रसाद ओकभारत माझा देश आहे... (फक्त ही भावना तेव्हाच जागी होते, जेव्हा बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिक आपल्या जवानांना हकनाक गोळ्या घालतात किंवा आपण एखादी क्रिकेटची मॅच हरतो आणि कोणीतरी 'भारत देशी बार'मधे बसून खूप वैतागलेला असतो... तेव्हाच हं... )सारे भारतीय माझे बांधव आहेत... (तरी हिंदू-मुस्लीम दंगे होतात, तेव्हा आधी मी माझ्या घरच्या बांधवांनाच वाचवतो आणि परक्या बांधवांना घरात येऊन शिव्या घालतो.)माझ्या देशावर माझे प्रेम आहे...(पण प्रेमासाठी असलेल्या इतर सगळ्या गोष्टींमधून मला वेळ मिळेल तेव्हा हं.) माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. (म्हणूनच दहीहंडीच्या दिवशी दह्याऐवजी दारू ढोसून आम्ही आमच्याच इगोची मटकी फोडतो. गणपतीच्या मांडवाखाली ‘बसतो’ आणि ‘चकणा’ म्हणून मोदक खातो. होळी रंगपंचमीला जगात फक्त 'काळा'च रंग शिल्लक असावा, अशा मनोवृत्तीने वागतो. क्रिसमसला त्यांच्याकडे संता असला, तरी आपल्याकडे संत आहेत आणि काही क्लॉज घालून दिलेत हे विसरून आपण ‘रम’माण होतो आणि दिवाळीत नको त्या 'दारू'ची आतषबाजी करतो.)मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन, प्रत्येकाशी सौजन्याने वागेन...(फक्त हे सगळे जेव्हा माझ्या मनासारखे वागायची मला परवानगी देतील तेव्हाच आणि गुरुजन असताना पालक का शिकवतात किंवा आईवडील असताना गुरुजन कशाकरिता माया अन् प्रेम दाखवतात... किंवा प्रत्येक वडीलधारा माणूस आगाऊ नसतो किंवा प्रत्येक आगाऊ माणूस वडीलधाराही नसतो. अशा सगळ्या शंका माझ्या मनातून दूर होतील तेव्हाच हं)माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे...(फक्त लाच घेताना किंवा भ्रष्टाचार करताना आपण कोणाला किंवा कोणी आपल्याला पाहिले तर गुपचूप बसणे, सांभाळून घेणे... म्हणजे सो कोल्ड निष्ठा राखणे नाही, हे जेव्हा मला किंवा समोरच्याला कळेल तेव्हाच हं...)त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे...( जुगार, मटका, लॉटरीमुळे... ‘झालं कल्याण’ असे आपण म्हणतो, ते हे कल्याण नव्हे आणि... सुरू केली तेव्हा पंधरा-वीस दिवसांत एखादा पेग घ्यायचा, आता बसल्याजागी रोज दीड खंबा संपवतो... ही ती 'समृद्धी' नव्हे... हे जेव्हा कळायचे त्याला कळेल तेव्हाच हं...)असो...कंसा बाहेर माझा देश बोलतोय...आणि कंसात माझी कंट्री बोलतेय...

(लेखक प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आहेत.)