शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

स्वतंत्र विदर्भ ही जनसामान्यांची मागणी

By admin | Updated: December 19, 2015 02:00 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य ही ९७ टक्केजनसामान्यांची मागणी आहे. मुंबईसाठी बलिदान केलेल्या १०५ हुतात्म्यांबद्दल मला आदरच आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठीचा माझा सत्याग्रह

औरंगाबाद : स्वतंत्र विदर्भ राज्य ही ९७ टक्केजनसामान्यांची मागणी आहे. मुंबईसाठी बलिदान केलेल्या १०५ हुतात्म्यांबद्दल मला आदरच आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठीचा माझा सत्याग्रह हा वैयक्तिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनायक बापूजी अणे यांचीही हीच भूमिका होती, असे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्पष्ट केले.चार आयोगांनी आपल्या अहवालात स्वतंत्र विदर्भाची शिफारस केली होती. कायदेशीर मार्गानेच स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न सोडविला जावा, राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करूनच ही प्रक्रिया व्हावी, अशी माझी आग्रही भूमिका आहे, असे अणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते एका याचिकेच्या सुनावणीसाठी औरंगाबादला आले होते.सेनेची भूमिका अधिवेशनापुरतीच होती काय, या प्रश्नावर अणे म्हणाले की, अधिवेशन हे एक निमित्त होते. ती भूमिका त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा भाग आहे. वेगळ््या विदर्भाला सेनेचा दीर्घकाळापासून विरोध आहे.स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती ही आर्थिकदृष्ट्या योग्य असेल काय, या प्रश्नाला उत्तर देताना अणे म्हणाले की, इंग्रज देश सोडून गेले तेव्हा तसेच पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन एकापेक्षा अधिक राज्यांची निर्मिती झाली, तेव्हासुद्धा हा मुद्दा उपस्थित झाला नाही. स्वतंत्र राज्य का नको, यासाठी या मुद्याचा वापर केला जातो. जनमत विचारात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे, शांततेच्या मार्गानेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती व्हावी, अशी आमची भूमिका आहे. (प्रतिनिधी)सलमान खान प्रकरणी आव्हान देणार का?अभिनेता सलमान खानबाबतच्या निकालाविरुद्ध राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे काय, असे विचारले असता अणे म्हणाले, उपरोक्त प्रकरणाचा नुकताच निकाल लागला आहे. त्याबाबत सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकले जाईल. नंतर हे प्रकरण गृह आणि विधी व न्याय विभागाकडे पाठविल्यानंतर महाधिवक्त्यांकडे अभिप्रायासाठी पाठविले जाते. ही प्रक्रिया होण्यासाठी जवळपास दोन-तीन महिने लागतात. प्रकरण महाधिवक्त्यांकडे पाठविणे बंधनकारक नाही. ती एक प्रथा आहे, असे अणे म्हणाले.