शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

स्वतंत्र विदर्भ ही जनसामान्यांची मागणी

By admin | Updated: December 19, 2015 02:00 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य ही ९७ टक्केजनसामान्यांची मागणी आहे. मुंबईसाठी बलिदान केलेल्या १०५ हुतात्म्यांबद्दल मला आदरच आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठीचा माझा सत्याग्रह

औरंगाबाद : स्वतंत्र विदर्भ राज्य ही ९७ टक्केजनसामान्यांची मागणी आहे. मुंबईसाठी बलिदान केलेल्या १०५ हुतात्म्यांबद्दल मला आदरच आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठीचा माझा सत्याग्रह हा वैयक्तिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनायक बापूजी अणे यांचीही हीच भूमिका होती, असे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्पष्ट केले.चार आयोगांनी आपल्या अहवालात स्वतंत्र विदर्भाची शिफारस केली होती. कायदेशीर मार्गानेच स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न सोडविला जावा, राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करूनच ही प्रक्रिया व्हावी, अशी माझी आग्रही भूमिका आहे, असे अणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते एका याचिकेच्या सुनावणीसाठी औरंगाबादला आले होते.सेनेची भूमिका अधिवेशनापुरतीच होती काय, या प्रश्नावर अणे म्हणाले की, अधिवेशन हे एक निमित्त होते. ती भूमिका त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा भाग आहे. वेगळ््या विदर्भाला सेनेचा दीर्घकाळापासून विरोध आहे.स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती ही आर्थिकदृष्ट्या योग्य असेल काय, या प्रश्नाला उत्तर देताना अणे म्हणाले की, इंग्रज देश सोडून गेले तेव्हा तसेच पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन एकापेक्षा अधिक राज्यांची निर्मिती झाली, तेव्हासुद्धा हा मुद्दा उपस्थित झाला नाही. स्वतंत्र राज्य का नको, यासाठी या मुद्याचा वापर केला जातो. जनमत विचारात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे, शांततेच्या मार्गानेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती व्हावी, अशी आमची भूमिका आहे. (प्रतिनिधी)सलमान खान प्रकरणी आव्हान देणार का?अभिनेता सलमान खानबाबतच्या निकालाविरुद्ध राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे काय, असे विचारले असता अणे म्हणाले, उपरोक्त प्रकरणाचा नुकताच निकाल लागला आहे. त्याबाबत सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकले जाईल. नंतर हे प्रकरण गृह आणि विधी व न्याय विभागाकडे पाठविल्यानंतर महाधिवक्त्यांकडे अभिप्रायासाठी पाठविले जाते. ही प्रक्रिया होण्यासाठी जवळपास दोन-तीन महिने लागतात. प्रकरण महाधिवक्त्यांकडे पाठविणे बंधनकारक नाही. ती एक प्रथा आहे, असे अणे म्हणाले.