शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पायाभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधी

By admin | Updated: July 11, 2016 05:30 IST

विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा निधी स्थापन करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या (अर्थ) अध्यक्षतेखालील समिती

मुंबई : विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा निधी स्थापन करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या (अर्थ) अध्यक्षतेखालील समिती हा निधी किती असावा यावर निर्णय घेईल. हा निधी तीन ते पाच लाख कोटी रुपयांदरम्यान असेल.राज्य सरकार हा निधी विदेशी बँका, गुंतवणूकदार आणि जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जपान इंटरनॅशनल कोआॅपरेशन एजन्सी आदी संस्थांकडून उभा करू इच्छिते. यातून रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २५ हजार कोटी, पाटबंधारे प्रकल्पांसाठी ८० हजार कोटी, मुंबई-नागपूर एक्स्प्रेस-वेसाठी ३० हजार कोटी, वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी ५० हजार कोटी रुपये व राज्य महामार्ग पूर्ण करण्यासाठी ३० हजार कोटी रुपये वापरण्यात येतील.अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग, गडचांदूर-अदिलाबाद, कोल्हापूर-वैभववाडी आणि बारामती-लोणंद मार्ग आदींसह महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पायाभूत निधीचा प्रस्ताव मांडला होता. महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने गेल्या एप्रिलमध्ये या प्रकल्पांसाठी निधी स्थापन करण्यास मान्यता दिली. हा निधी ज्या संस्थांकडून उभा राहील त्यांना परतफेड करण्यास हमीपत्र देण्यासही सरकारची तयारी आहे, असे या निधी विषयाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी कमी करून तो चार वर्षे करावा अशी सरकारचीच इच्छा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)