शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पिंपरी गावासाठी स्वतंत्र विकास आराखडा

By admin | Updated: December 8, 2014 02:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील आदर्श ग्राम योजनेत कल्याण तालुक्यातील पिंपरी गावाची निवड खा. राजन विचारे यांनी केली आहे

डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील आदर्श ग्राम योजनेत कल्याण तालुक्यातील पिंपरी गावाची निवड खा. राजन विचारे यांनी केली आहे. त्या ठिकाणच्या मुलभूत समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यातील पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्या गावासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या संदर्भात विशेष बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात नुकतीच संपन्न झाली. गावातील लोकाना पिण्याची पाण्याची समस्या भेडसावत असून गावाची लोकसंख्या ३८४१ असून गावासाठी वेगळी पाणी पुरवठा योजना आखण्यात येणार आहे. याशिवाय गावातील अतंर्गत रस्ते, रोड लाईट, तलाव सुशीभीकरण, सार्वजनिक शौचालय, गटार, सार्वजनिक वाचनालयाची इमारत, स्मशानभूमी, नवीन अगण वाडी, जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती व सरक्षक भिंत ,समाज मंदिराची दुरुस्ती, उद्यानेआदी कामे देखील विकास आराखड्यात प्रस्तावित दाखवण्यात आली आहेत. त्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली व गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कोणत्या योजनाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, याची सविस्तर चर्चा केली. या कोयना धरणाच्या बांधकामासाठी विस्तापित झालेल्या या गावातील प्रकल्प ग्रताना पाणी पुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरु करावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या बैठकीला उप विभागीय अधिकारी एस. गिरासे , ठाणे तहसीलदार विकास पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)