शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

गरज भासल्यास वाढीव निधी

By admin | Updated: August 20, 2015 00:38 IST

कुंभमेळा हा जागतिक आस्थेचे प्रतीक असलेला सोहळा असल्याने त्यासाठी आत्तापर्यंत राज्य शासनाने आर्थिक मदत कमी पडू दिलेली नाही.

नाशिक : कुंभमेळा हा जागतिक आस्थेचे प्रतीक असलेला सोहळा असल्याने त्यासाठी आत्तापर्यंत राज्य शासनाने आर्थिक मदत कमी पडू दिलेली नाही. आणखी काही कामांच्या पूर्ततेसाठी पैशांची गरज भासल्यास वाढीव निधी दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या साधुग्राममध्ये वैष्णव आखाड्यांचे ध्वजारोहण व त्र्यंबकेश्वर येथे नाथपंथीय समाज संघाचा नवनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत बुधवारी झाला. नाशिक महापालिकेने साकारलेल्या साधुग्रामच्या प. पू. जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा झाला. त्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कुंभमेळ््यात साधूसंतांच्या सेवेची संधी प्राप्त होते. कुंभमेळ्याचे नियोजन हा व्यवस्थापन शास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचा भाग असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. कुंभमेळ्याची तिथी व मुहूर्त कधी ठरतो हे कोणालाच ठाऊक नसते परंतु तरीही कोणालाही कोणतेही निमंत्रण न देता करोडो हिंदूधर्मीय अगदी मुहूर्तावर सोहळ्यास हजेरी लावतात, असे ते म्हणाले. कुंभमेळ्यासाठी चार वर्षांपूर्वीच आराखडा तयार करून तीन वर्षांपूर्वीच कामे सुरू केली होती. तत्कालीन आघाडी सरकारने त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला होता, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात रस्ते रुंदीकरण, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकासाची कामे वेगाने झाल्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास, हंसदेवाचार्य, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. शेकडो वर्षांच्या प्रथा-परंपरेनुसार सिंहस्थ कुंभमेळा आजही सुरुच आहे. विश्वाला मार्गदर्शन करण्याची ताकद हिंदू धर्मात आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.335 एकर साधुग्राममधील वैष्णवांच्या तीनही अनी आखाड्यांमध्ये श्रावण शुद्ध पंचमीच्या मंगल प्रभातसमयी वेदमंत्रोच्चारात ५१ फुटी ध्वजस्तंभांवर देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्या हस्ते धर्मध्वजा फडकल्या आणि तपोभूमीत धर्मरक्षणाचा हुंकार घुमत संपूर्ण कुंभपर्वाला दिमाखात प्रारंभ झाला.दीडशे वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळ्यात एकत्रच १३ आखाड्यांतील साधू-महंत शाहीस्नान करीत होते. कालांतराने तीन आखाडे नाशिकला गेले. मात्र सर्व आखाड्यांनी मूळ परंपरा असलेल्या त्र्यंबकेश्वर येथेच शाहीस्नान करावे, अशी अपेक्षा आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी व अमित शहा यांनी त्र्यंबकेश्वर येथे बैठकीत व्यक्त केली.