शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

कर्जमाफीसाठी सरकारवर वाढता दबाव

By admin | Updated: April 4, 2017 06:55 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेला असतानाच आता शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संपाचे हत्यार उपसले आहे

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेला असतानाच आता शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संपाचे हत्यार उपसले आहे, तर शेतकरी नेत्यांनीही आंदोलनाची हाक दिल्यामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा, कृषीपंपाचे वीजबिल माफ करावे आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. यासंदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे सोमवारी प्रातिनिधीक ग्रामसभा झाली. या सभेला राज्यातील ४० गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे संघटन बांधण्यासाठी राज्यभर ही चळवळ पोहोचविण्याचे पुणतांबा येथील ग्रामसभेत ठरले. सरपंच छाया जोगदंड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जूनपासून भाजीपाला, दुधाची विक्रीच बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, वैजापूर, धुळे, औरंगाबाद, निफाड आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सात मागण्यांचा ठराव ग्रामसभेने केला. अशाच ग्रामसभा आता गावोगावी होणार असून त्याचा ठराव तहसीलदारांना देण्यात येईल.विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा सुरू केली असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी अक्षय्यतृतीयेपासून आंदोलनात उतरणार आहेत. कोल्हापूरपासून त्याची सुरुवात होईल. राष्ट्रीय किसान ऋणमुक्त अभियानांतर्गत संघटनेने साडेसहा लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. त्यात शेती परवडत नसल्याचा निष्कर्ष निघाला. पंतप्रधान व राष्ट्रपतींची भेट मागितली असून त्यांना किसान ऋणमुक्त अभियानाचा अहवाल देणार असल्याचे शेट्टी यांनी लोकमतला सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘सीएम टू पीएम’ आसूड यात्राशेतकरी संघटना आणि आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरापासून ११ एप्रिलपासून एकत्रित शेतकरी आसूड यात्रा काढणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत दिली. यात्रेची सांगता २१ एप्रिलला पंतप्रधानांच्या वडनगर (गुजरात) गावी होणार आहे. सीएम टू पीएम असे हे आसूड आंदोलन होणार आहे. अकार्यक्षम मंत्र्यांच्या गाड्यांना काळे फासण्याचे आंदोलन हाती घेण्यात येईल, असे बच्चू कडू यांनी अकोला येथे सांगितले. >ही अराजकतेची नांदीपुणतांब्याची ग्रामसभा ही क्रांतीची सुरवात आहे. शेतकऱ्याने शेतात जायचे नाही, असे ठरविल्याने ही अराजकतेची नांदी ठरणार आहे.- खा.राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना >चांदवडला लाक्षणिक उपोषणशेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चांदवडला (नाशिक) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात माजी आ. शिरीष कोतवाल, उपसभापती अमोल भालेराव, डॉ. सयाजीराव गायकवाड आदी सहभागी झाले होते. >टॉवरवर चढून आंदोलन शेतातील जळालेला डीपी दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी वारंवार खेटे घालूनही निराशा पदरी आलेल्या शिरापुरचे शेतकरी अनिल पाटील यांनी लोकशाही दिनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन केले़डीपी जळून दोन महिने झाले तरी महावितरणने तो दुरूस्त केला नाही़ महसूल प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.