शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कर्जमाफीसाठी सरकारवर वाढता दबाव

By admin | Updated: April 4, 2017 06:55 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेला असतानाच आता शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संपाचे हत्यार उपसले आहे

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेला असतानाच आता शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संपाचे हत्यार उपसले आहे, तर शेतकरी नेत्यांनीही आंदोलनाची हाक दिल्यामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा, कृषीपंपाचे वीजबिल माफ करावे आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. यासंदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे सोमवारी प्रातिनिधीक ग्रामसभा झाली. या सभेला राज्यातील ४० गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे संघटन बांधण्यासाठी राज्यभर ही चळवळ पोहोचविण्याचे पुणतांबा येथील ग्रामसभेत ठरले. सरपंच छाया जोगदंड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जूनपासून भाजीपाला, दुधाची विक्रीच बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, वैजापूर, धुळे, औरंगाबाद, निफाड आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सात मागण्यांचा ठराव ग्रामसभेने केला. अशाच ग्रामसभा आता गावोगावी होणार असून त्याचा ठराव तहसीलदारांना देण्यात येईल.विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा सुरू केली असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी अक्षय्यतृतीयेपासून आंदोलनात उतरणार आहेत. कोल्हापूरपासून त्याची सुरुवात होईल. राष्ट्रीय किसान ऋणमुक्त अभियानांतर्गत संघटनेने साडेसहा लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. त्यात शेती परवडत नसल्याचा निष्कर्ष निघाला. पंतप्रधान व राष्ट्रपतींची भेट मागितली असून त्यांना किसान ऋणमुक्त अभियानाचा अहवाल देणार असल्याचे शेट्टी यांनी लोकमतला सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘सीएम टू पीएम’ आसूड यात्राशेतकरी संघटना आणि आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरापासून ११ एप्रिलपासून एकत्रित शेतकरी आसूड यात्रा काढणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत दिली. यात्रेची सांगता २१ एप्रिलला पंतप्रधानांच्या वडनगर (गुजरात) गावी होणार आहे. सीएम टू पीएम असे हे आसूड आंदोलन होणार आहे. अकार्यक्षम मंत्र्यांच्या गाड्यांना काळे फासण्याचे आंदोलन हाती घेण्यात येईल, असे बच्चू कडू यांनी अकोला येथे सांगितले. >ही अराजकतेची नांदीपुणतांब्याची ग्रामसभा ही क्रांतीची सुरवात आहे. शेतकऱ्याने शेतात जायचे नाही, असे ठरविल्याने ही अराजकतेची नांदी ठरणार आहे.- खा.राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना >चांदवडला लाक्षणिक उपोषणशेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चांदवडला (नाशिक) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात माजी आ. शिरीष कोतवाल, उपसभापती अमोल भालेराव, डॉ. सयाजीराव गायकवाड आदी सहभागी झाले होते. >टॉवरवर चढून आंदोलन शेतातील जळालेला डीपी दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी वारंवार खेटे घालूनही निराशा पदरी आलेल्या शिरापुरचे शेतकरी अनिल पाटील यांनी लोकशाही दिनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन केले़डीपी जळून दोन महिने झाले तरी महावितरणने तो दुरूस्त केला नाही़ महसूल प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.