शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

निवडणुकीसाठी वाढीव मतदान केंद्रे

By admin | Updated: September 10, 2016 00:52 IST

यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये नागरिकांना एकऐवजी चार वेळा मतदान करावे लागणार आहे;

पुणे : यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये नागरिकांना एकऐवजी चार वेळा मतदान करावे लागणार आहे; त्यामुळे एका मतदाराला मतदान करण्यासाठी नेहमीपेक्षा तिप्पट जास्त वेळ लागेल. या पार्श्वभूमीवर, वाढीव मतदान केंद्र व कर्मचाऱ्यांची फौज महापालिकेला लागणार आहे. त्यासाठी शहरातील १,५०० शासकीय व निमशासकीय कार्यालयांना पत्र पाठवून कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने नोंदविण्यात आली आहे.प्रभागरचना करण्याचे काम पूर्ण केल्यानंतर पालिकेचा निवडणूक विभाग आता निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. महापालिकेची यंदाची निवडणूक पहिल्यांदाच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे निवडणूक विभागाला नेहमीपेक्षा जास्तीची तयारी करावी लागत आहे. निवडणूक यशस्वी पद्धतीने पार पाडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. निवडणूक आयोगाने महिनाभरापूर्वीच ४ प्रभागीय पद्धतीनुसार एका मतदाराला मतदान करण्यासाठी किती वेळ लागू शकेल, याचा अहवाल सर्व महापालिकांकडून मागवून घेतला आहे.महापालिकेच्या वतीने १४ आॅक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे आणखीन नवीन मतदारांची भर पडणार आहे. मतदारांची संख्या, मतदानाला लागणारा वेळ या सगळ्या बाबींचा विचार करून मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये एका मतदारसंघात ३५० ते ४०० केंद्रे उभारण्यात आली होती. एका केंद्रासाठी ४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ निवडणूक आयोगाला करावी लागणार आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे.महापालिकेच्या निवडणूक विभागाने सध्या १,५०० कार्यालयांना पत्र पाठवून कर्मचाऱ्यांची मागणी नोंदविली आहे. सर्व कार्यालयांमधून एकूण किती कर्मचारी उपलब्ध होऊ शकतील, याची चाचपणी केली जात आहे. किमान २५ हजार कर्मचारी यासाठी लागू शकतील, असा सध्याचा अंदाज आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून २० टक्के राखीव कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येईल.मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबरच मतदानाची वेळ वाढविण्याबाबत निवडणूक आयोगाकडून विचार केला जात आहे. निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.>मतदारांसाठी नावनोंदणी मोहीममहापालिका निवडणुकीसाठी १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदारांसाठी नावनोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.१ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना या यादीमध्ये स्वत:चे नाव समाविष्ट करता येईल. मतदारांना नाव आणि पत्त्यामध्ये बदल, नव्याने नाव समाविष्ट करणे, नाव वगळायचे असल्यास नजीकच्या मतदान नोंदणी केंद्रामध्ये जाऊन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.