शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

उत्तीर्ण वाढले, प्लेसमेंट वाढेना

By admin | Updated: May 31, 2016 02:16 IST

मागील काही वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असले, तरी पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

पुणे : मागील काही वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असले, तरी पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्लेसमेंटचा आकडा वाढताना दिसत नाही. राज्यभरात प्लेसमेंटचे सरासरी प्रमाण काही वर्षांपासून ३५ टक्क्यांच्या जवळपास आहे. मागील वर्षी त्यामध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.राज्यात भरमसाट वाढलेल्या संस्थांमध्ये अभियांत्रिकीच्या दर वर्षी हजारो जागा रिक्त राहतात. या तंत्रशाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत चालला आहे. मात्र, असे असले तरी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभियांत्रिकी पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दर वर्षी वाढत आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून ही स्थिती समोर आली आहे. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत असताना प्लेसमेंट म्हणजे संस्थेत शिकत असताना विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याचे प्रमाण मात्र स्थिर राहिले आहे. शैक्षणिक वर्ष २०१३-१४मध्ये एकूण १ लाख ९५ हजार ९१ विद्यार्थ्यांनी राज्यभरातील विविध अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश निश्चित केला होता. त्यापैकी ८२ हजार ७४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील २९ हजार ५५७ विद्यार्थ्यांना संस्थास्तरावरून प्लेसमेंट मिळाली. त्यापुढील वर्षी प्रवेशसंख्या कमी झाली, तरी उत्तीर्णतेचे प्रमाण वाढून ८९ हजार ५२६ पर्यंत गेले. हे प्रमाण ७ हजारांनी वाढले असले, तरी प्लेसमेंटचे प्रमाण २ ते अडीच हजारांनी वाढल्याचे दिसते. मागील वर्षात हे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.