शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

‘जलयुक्त शिवार’मुळे गावोगावी पाणीसाठ्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 01:54 IST

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ११३ किलोमीटर लांबीचे खोलीकरण

- समीर देशपांडे, कोल्हापूर

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ११३ किलोमीटर लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यातून ३७ लाख ४५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. कोल्हापूरची पाणीपातळी चांगली असल्याने, या कामाला सातारा आणि सांगली जिल्ह्यांत चांगला वाव असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.गेल्या वर्षीपासून जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात करण्यात आली. सर्व शासकीय योजनांचे एकत्रीकरण करीत, ‘पाणी अडविणे, पाणी जिरविणे’ या कामांना प्राधान्य देत कधी नव्हे ते गाळ काढण्यासाठी प्राधान्य दिले गेले. त्यामुळे गावोगावी वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली. परिणामी, अनेक गावांमध्ये पाणीसाठ्यांत वाढ झाली, तर काही ठिकाणी पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. गतवर्षी पाऊस लांबला होता, त्यामुळे गाळ काढण्याच्या मोहिमेने गती घेतली होती. यंदा या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील २१०, सांगली जिल्ह्यातील १४०, तर कोल्हापूर जिल्ह्यातील २० गावे निवडली आहेत. या एकूण ३७० गावांपैकी २६० गावांमध्ये लोकसहभागातून कामे सुरू झाली आहेत. कामांची एकूण संख्या ७९२ असून, त्यातील ४५२ लोकसहभागाची व ३४० शासकीय कामे आहेत. या तिन्ही जिल्ह्यांत १२ कोटी ५५ लाख रुपयांची ही कामे झाली आहेत.राजस्थानचे पथक पाहणीसाठी येणारकोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणलोट क्षेत्रात झालेले काम पाहण्यासाठी, तसेच कृषी योजनांचा आढावा घेण्यासाठी राजस्थानचे ग्रामविकासमंत्री राजेंद्रसिंग राठोड यांच्यासह ३० जणांचे पथक ४ आणि ५ जानेवारीला येत आहे. सिद्धिविनायक व साई संस्थानकडून निधीमुंबई येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्ट व श्री साईबाबा संस्थान, शिर्डी या दोन देवस्थानांनी जलयुक्त शिवारसाठी देणगी दिली होती. त्यातील सुमारे चार कोटी रुपयांचा निधी हा कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना मिळाला आहे. त्यातून या दोन जिल्ह्यांत ८६ कामे सुरू करण्यात आली आहेत.