शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘जलयुक्त शिवार’मुळे गावोगावी पाणीसाठ्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 01:54 IST

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ११३ किलोमीटर लांबीचे खोलीकरण

- समीर देशपांडे, कोल्हापूर

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ११३ किलोमीटर लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यातून ३७ लाख ४५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. कोल्हापूरची पाणीपातळी चांगली असल्याने, या कामाला सातारा आणि सांगली जिल्ह्यांत चांगला वाव असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.गेल्या वर्षीपासून जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात करण्यात आली. सर्व शासकीय योजनांचे एकत्रीकरण करीत, ‘पाणी अडविणे, पाणी जिरविणे’ या कामांना प्राधान्य देत कधी नव्हे ते गाळ काढण्यासाठी प्राधान्य दिले गेले. त्यामुळे गावोगावी वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली. परिणामी, अनेक गावांमध्ये पाणीसाठ्यांत वाढ झाली, तर काही ठिकाणी पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. गतवर्षी पाऊस लांबला होता, त्यामुळे गाळ काढण्याच्या मोहिमेने गती घेतली होती. यंदा या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील २१०, सांगली जिल्ह्यातील १४०, तर कोल्हापूर जिल्ह्यातील २० गावे निवडली आहेत. या एकूण ३७० गावांपैकी २६० गावांमध्ये लोकसहभागातून कामे सुरू झाली आहेत. कामांची एकूण संख्या ७९२ असून, त्यातील ४५२ लोकसहभागाची व ३४० शासकीय कामे आहेत. या तिन्ही जिल्ह्यांत १२ कोटी ५५ लाख रुपयांची ही कामे झाली आहेत.राजस्थानचे पथक पाहणीसाठी येणारकोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणलोट क्षेत्रात झालेले काम पाहण्यासाठी, तसेच कृषी योजनांचा आढावा घेण्यासाठी राजस्थानचे ग्रामविकासमंत्री राजेंद्रसिंग राठोड यांच्यासह ३० जणांचे पथक ४ आणि ५ जानेवारीला येत आहे. सिद्धिविनायक व साई संस्थानकडून निधीमुंबई येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्ट व श्री साईबाबा संस्थान, शिर्डी या दोन देवस्थानांनी जलयुक्त शिवारसाठी देणगी दिली होती. त्यातील सुमारे चार कोटी रुपयांचा निधी हा कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना मिळाला आहे. त्यातून या दोन जिल्ह्यांत ८६ कामे सुरू करण्यात आली आहेत.