शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भातसा, बारवी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ

By admin | Updated: July 9, 2016 17:59 IST

भातसा, बारवी या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली असून तुलनेने या क्षेत्रात उत्तम पाउस झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
ठाणे, दि. 09 - भातसा, बारवी या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली असून तुलनेने या क्षेत्रात उत्तम पाउस झाला आहे असे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून समजते. भातसामध्ये सध्या ४१.०१ टक्के पाणी आहे . गेल्या वर्षी याच सुमारास ते ३६.३५ टक्के होते. बारवी मध्ये सध्या ३३.५३ टक्के पाणी आहे . गेल्या वर्षी ते याच सुमारास २३.८० टक्के इतके होते. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत बऱ्याच प्रकल्पांत यंदा चांगला पाणीसाठा हे असे दिसते. 
 
टाटा कंपनीकडील पुणे जिल्ह्यातल्या आंध्र प्रकल्पात मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी म्हणजे १३.३२ टक्के पाणीसाठा आहे. याठिकाणी गेल्या वर्षी २०.६३ टक्के पाणी होते.  लघू प्रकल्पापैकी जांभे, डोळखांब, आदिवली या शहापूर तालुक्यातील तर अंबरनाथ मधील भोज आणि मुरबाड तालुक्यातील घसाई आणि पाडाळे या प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. मुसई, जान्भूर्डे, उसगाव, जांभिवली या प्रकल्पांतही पावसामुळे चांगला पाणीसाठा झाला आहे. 
 
पालघर जिल्ह्यातील धामणी या मोठ्या प्रकल्पात ३९.७७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ३६.४४ टक्के होता. तर कवडास मध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.  बृहन्मुंबई मनपाकडे असलेल्या २२.३० इतका तर तानसा मध्ये ३२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या दोन्ही तलावांमध्ये अनुक्रमे ४२.६३ आणि १८ टक्के इतका पाणीसाठा होता. गेल्या वर्षीपेक्षा या वेळेस धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याचे दिसते. 
 
(गेल्या वर्षीची आकडेवारी कंसात मिमी मध्ये १ जूनपासून ) 
धामणी ८३१ मिमी( ६३१ मिमी), कवडास ८३१ मिमी( ६५१ मिमी), भातसा ६८१मिमी( ६२४ मिमी), वांद्री ८३९ मिमी( ६८७ मिमी), मोडकसागर ५९६ मिमी( ५११ मिमी), तानसा ६०८.६० मिमी ( ४३० मिमी), बारवी ६६८ मिमी( ३९४ मिमी).