शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

भातसा, बारवी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ

By admin | Updated: July 9, 2016 17:59 IST

भातसा, बारवी या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली असून तुलनेने या क्षेत्रात उत्तम पाउस झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
ठाणे, दि. 09 - भातसा, बारवी या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली असून तुलनेने या क्षेत्रात उत्तम पाउस झाला आहे असे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून समजते. भातसामध्ये सध्या ४१.०१ टक्के पाणी आहे . गेल्या वर्षी याच सुमारास ते ३६.३५ टक्के होते. बारवी मध्ये सध्या ३३.५३ टक्के पाणी आहे . गेल्या वर्षी ते याच सुमारास २३.८० टक्के इतके होते. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत बऱ्याच प्रकल्पांत यंदा चांगला पाणीसाठा हे असे दिसते. 
 
टाटा कंपनीकडील पुणे जिल्ह्यातल्या आंध्र प्रकल्पात मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी म्हणजे १३.३२ टक्के पाणीसाठा आहे. याठिकाणी गेल्या वर्षी २०.६३ टक्के पाणी होते.  लघू प्रकल्पापैकी जांभे, डोळखांब, आदिवली या शहापूर तालुक्यातील तर अंबरनाथ मधील भोज आणि मुरबाड तालुक्यातील घसाई आणि पाडाळे या प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. मुसई, जान्भूर्डे, उसगाव, जांभिवली या प्रकल्पांतही पावसामुळे चांगला पाणीसाठा झाला आहे. 
 
पालघर जिल्ह्यातील धामणी या मोठ्या प्रकल्पात ३९.७७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ३६.४४ टक्के होता. तर कवडास मध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.  बृहन्मुंबई मनपाकडे असलेल्या २२.३० इतका तर तानसा मध्ये ३२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या दोन्ही तलावांमध्ये अनुक्रमे ४२.६३ आणि १८ टक्के इतका पाणीसाठा होता. गेल्या वर्षीपेक्षा या वेळेस धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याचे दिसते. 
 
(गेल्या वर्षीची आकडेवारी कंसात मिमी मध्ये १ जूनपासून ) 
धामणी ८३१ मिमी( ६३१ मिमी), कवडास ८३१ मिमी( ६५१ मिमी), भातसा ६८१मिमी( ६२४ मिमी), वांद्री ८३९ मिमी( ६८७ मिमी), मोडकसागर ५९६ मिमी( ५११ मिमी), तानसा ६०८.६० मिमी ( ४३० मिमी), बारवी ६६८ मिमी( ३९४ मिमी).