शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

बॉम्बस्फोटपीडितांच्या नुकसानभरपाईत वाढ

By admin | Updated: January 15, 2017 02:12 IST

राज्यभरात झालेल्या बॉम्बस्फोटांतील पीडितांच्या नुकसानभरपाई रकमेत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : राज्यभरात झालेल्या बॉम्बस्फोटांतील पीडितांच्या नुकसानभरपाई रकमेत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली.यापूर्वी दहशतवादी हल्ले व बॉम्बस्फोट हल्ल्यांतील पीडितांना एक लाख रुपये इतकी नुकसानभरपाईची रक्कम दिली जायची. मात्र आता ही रक्कम पाच लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारने मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. तर केंद्र सरकारने नुकसानभरपाईची रक्कम तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढविल्याचे खंडपीठाला सांगितले.दहशतवादी हल्ला व बॉम्बस्फोटातील पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ केल्याची माहिती केंद्र व राज्य सरकारने दिल्यानंतर खंडपीठाने याचिका निकाली काढली. बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्याचा आदेश केंद्र व राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी याचिका व्यवसायाने वकील असलेले राजेश्वर पांचाळ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत केंद्र सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना कशा प्रकारे नुकसानभरपाईची रक्कम द्यायची, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखल्याची माहितीही खंडपीठाला दिली. नुकसानभरपाईची रक्कम ठरवताना मृत व्यक्तीचे राहणीमान, त्याचे वेतन आणि त्याच्यावर किती जण अवलंबून होते आदी बाबींचा विचार करावा आणि त्यानुसार त्याला नुकसानभरपाईची रक्कम द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे केली होती. (प्रतिनिधी)- यापूर्वीच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांना ३ लाख रुपये नुकसानभरपाई दिल्याचे खंडपीठाला सांगितले होते. नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याचे पोलीस उपायुक्त अश्विनी सानप यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे खंडपीठाला सांगितले होते.