शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बस्फोटपीडितांच्या नुकसानभरपाईत वाढ

By admin | Updated: January 15, 2017 02:12 IST

राज्यभरात झालेल्या बॉम्बस्फोटांतील पीडितांच्या नुकसानभरपाई रकमेत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : राज्यभरात झालेल्या बॉम्बस्फोटांतील पीडितांच्या नुकसानभरपाई रकमेत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली.यापूर्वी दहशतवादी हल्ले व बॉम्बस्फोट हल्ल्यांतील पीडितांना एक लाख रुपये इतकी नुकसानभरपाईची रक्कम दिली जायची. मात्र आता ही रक्कम पाच लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारने मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. तर केंद्र सरकारने नुकसानभरपाईची रक्कम तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढविल्याचे खंडपीठाला सांगितले.दहशतवादी हल्ला व बॉम्बस्फोटातील पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ केल्याची माहिती केंद्र व राज्य सरकारने दिल्यानंतर खंडपीठाने याचिका निकाली काढली. बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्याचा आदेश केंद्र व राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी याचिका व्यवसायाने वकील असलेले राजेश्वर पांचाळ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत केंद्र सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना कशा प्रकारे नुकसानभरपाईची रक्कम द्यायची, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखल्याची माहितीही खंडपीठाला दिली. नुकसानभरपाईची रक्कम ठरवताना मृत व्यक्तीचे राहणीमान, त्याचे वेतन आणि त्याच्यावर किती जण अवलंबून होते आदी बाबींचा विचार करावा आणि त्यानुसार त्याला नुकसानभरपाईची रक्कम द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे केली होती. (प्रतिनिधी)- यापूर्वीच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांना ३ लाख रुपये नुकसानभरपाई दिल्याचे खंडपीठाला सांगितले होते. नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याचे पोलीस उपायुक्त अश्विनी सानप यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे खंडपीठाला सांगितले होते.