शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बस्फोटपीडितांच्या नुकसानभरपाईत वाढ

By admin | Updated: January 15, 2017 02:12 IST

राज्यभरात झालेल्या बॉम्बस्फोटांतील पीडितांच्या नुकसानभरपाई रकमेत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : राज्यभरात झालेल्या बॉम्बस्फोटांतील पीडितांच्या नुकसानभरपाई रकमेत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली.यापूर्वी दहशतवादी हल्ले व बॉम्बस्फोट हल्ल्यांतील पीडितांना एक लाख रुपये इतकी नुकसानभरपाईची रक्कम दिली जायची. मात्र आता ही रक्कम पाच लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारने मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली. तर केंद्र सरकारने नुकसानभरपाईची रक्कम तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढविल्याचे खंडपीठाला सांगितले.दहशतवादी हल्ला व बॉम्बस्फोटातील पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ केल्याची माहिती केंद्र व राज्य सरकारने दिल्यानंतर खंडपीठाने याचिका निकाली काढली. बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईत वाढ करण्याचा आदेश केंद्र व राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी याचिका व्यवसायाने वकील असलेले राजेश्वर पांचाळ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत केंद्र सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना कशा प्रकारे नुकसानभरपाईची रक्कम द्यायची, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखल्याची माहितीही खंडपीठाला दिली. नुकसानभरपाईची रक्कम ठरवताना मृत व्यक्तीचे राहणीमान, त्याचे वेतन आणि त्याच्यावर किती जण अवलंबून होते आदी बाबींचा विचार करावा आणि त्यानुसार त्याला नुकसानभरपाईची रक्कम द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे केली होती. (प्रतिनिधी)- यापूर्वीच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी २६/११च्या मुंबई हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांना ३ लाख रुपये नुकसानभरपाई दिल्याचे खंडपीठाला सांगितले होते. नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याचे पोलीस उपायुक्त अश्विनी सानप यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे खंडपीठाला सांगितले होते.