विभागासाठी ३०.३० कोटी: नागपूर २० कोटीनागपूर : राज्य शासनाने नागपूर विभागाच्या करमणूक कर वसुलीच्या उद्दिष्टात वाढ केली असून २०१४-१५ या वर्षासाठी ते ३०.३० कोटी करण्यात आले आहे. २०१३-१४ या वषात ते २२.९० कोटी होते.२०१३-१४ या वर्षात नागपूर विभागाला २२.९० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात नागपूर जिल्ह्यासाठी १४ कोटी, वर्धा जिल्ह्यासाठी १.९३ कोटी, भंडारा जिल्ह्यासाठी १.०९ कोटी, गोंदिया जिल्ह्यासाठी ९६ लाख, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ४.०९ कोटी आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी ८३ लाख रुपयांचा समावेश होता. नागपूर वगळता इतर जिल्ह्यांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठले आहे. २०१४-१५ या वर्षासाठी राज्य शासनाने कर वसुलीच्या उद्दिष्टात ८ कोटींनी वाढ करून ते ३०.३० कोटी केले आहे. नागपूर जिल्ह्यासाठी २० कोटी, वर्धा जिल्ह्यासाठी १.९५ कोटी, भंडारा जिल्ह्यासाठी १.२५ कोटी, गोंदिया जिल्ह्यासाठी १.१० कोटी, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ५ कोटी तर गडचिरोली जिल्ह्यासाठी १ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एप्रिल ते मे २०१४ अखेरपर्यत एकूण ३ कोटी ४४ लाख १२ हजाराची वसुली झाली आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातून २ कोटी ३३ लाख, वर्धा जिल्ह्यात ३० लाख, भंडारा जिल्ह्यातून १२.४९ लाख, गोंदिया जिल्ह्यातून १०.९९ लाख, चंद्रपूर जिल्ह्यातून ४५.६२ लाख आणि गडचिरोली जिल्ह्यातून १०.८४ लाख रुपयांची वसुली झाली. वसुलीची टक्केवारी ही ११.३६ टक्के आहे. नागपूर जिल्ह्यातील वसुली मात्र उणे ५७.८४ टक्के आहे. शहरात केबल जोडण्याधारकांची संख्या पाच पटीने वाढली आहे कराची थकबाकी ही २५ कोटींवर गेल्याची माहिती आहे. (प्रतिनिधिी)
करमणूक कर वसुलीच्या उद्दिष्टात वाढ'
By admin | Updated: June 13, 2014 01:20 IST