शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

बिबट्यांच्या अपघाती मृत्यूंत वाढ

By admin | Updated: January 30, 2015 03:59 IST

जिल्ह्यातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने व जंगलांतील संपुष्टात येत असलेले भक्ष्य, जानेवारीतच आटलेले पाणवठे व बिबळ्यांची वाढलेली संख्या यामुळे बिबळे

नंदकुमार टेणी,  ठाणेजिल्ह्यातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने व जंगलांतील संपुष्टात येत असलेले भक्ष्य, जानेवारीतच आटलेले पाणवठे व बिबळ्यांची वाढलेली संख्या यामुळे बिबळे अपघातात मरण पावण्याचे तसेच मनुष्यवस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील सर्वाधिक बिबटे हे ठाणे जिल्ह्यातील जंगलांत आहेत. ऊसतोडीचा हंगाम संपला की, प्रजोत्पादनासाठी नगर, पुणे, मराठवाडा, सोलापूर येथील उसात दडलेले बरेचसे बिबटे या जंगलात येतात. जंगलातील प्रजोत्पादनामुळे देखील त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत या जंगल क्षेत्रातील भक्ष्य अत्यंत घटले आहे. तसेच या जंगलात निसर्गनिर्मित आणि वनखात्याने निर्माण केलेले पाणवठेदेखील आटल्यामुळे बिबळ्यांना जंगलाबाहेर येणे भाग पडत आहे. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधार्थ बिबटे महामार्गांच्या जवळ येतात. वाहनांचे कर्कश प्रेशर हॉर्न त्यांना दचकावतात व ते बिथरतात. वाहनांना लावलेल्या प्रखर एलईडी डीपरमुळे त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी येते आणि ते चवताळतात. त्यामुळे अनेकदा समोर वाहन दिसत असतानाही ते रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि जखमी होतात, असा वनखात्याचा निष्कर्ष आहे. एकीकडे नैसर्गिकरीत्या बिबट्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे त्यांचे विषबाधा वा वाहनांच्या धडकेमुळे मृत्यू होऊ लागले आहेत. याबाबत, वनखात्याने तातडीने उपाय करण्याची गरज प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे.