शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

बिबट्यांच्या अपघाती मृत्यूंत वाढ

By admin | Updated: January 30, 2015 03:59 IST

जिल्ह्यातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने व जंगलांतील संपुष्टात येत असलेले भक्ष्य, जानेवारीतच आटलेले पाणवठे व बिबळ्यांची वाढलेली संख्या यामुळे बिबळे

नंदकुमार टेणी,  ठाणेजिल्ह्यातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने व जंगलांतील संपुष्टात येत असलेले भक्ष्य, जानेवारीतच आटलेले पाणवठे व बिबळ्यांची वाढलेली संख्या यामुळे बिबळे अपघातात मरण पावण्याचे तसेच मनुष्यवस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील सर्वाधिक बिबटे हे ठाणे जिल्ह्यातील जंगलांत आहेत. ऊसतोडीचा हंगाम संपला की, प्रजोत्पादनासाठी नगर, पुणे, मराठवाडा, सोलापूर येथील उसात दडलेले बरेचसे बिबटे या जंगलात येतात. जंगलातील प्रजोत्पादनामुळे देखील त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत या जंगल क्षेत्रातील भक्ष्य अत्यंत घटले आहे. तसेच या जंगलात निसर्गनिर्मित आणि वनखात्याने निर्माण केलेले पाणवठेदेखील आटल्यामुळे बिबळ्यांना जंगलाबाहेर येणे भाग पडत आहे. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधार्थ बिबटे महामार्गांच्या जवळ येतात. वाहनांचे कर्कश प्रेशर हॉर्न त्यांना दचकावतात व ते बिथरतात. वाहनांना लावलेल्या प्रखर एलईडी डीपरमुळे त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी येते आणि ते चवताळतात. त्यामुळे अनेकदा समोर वाहन दिसत असतानाही ते रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि जखमी होतात, असा वनखात्याचा निष्कर्ष आहे. एकीकडे नैसर्गिकरीत्या बिबट्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे त्यांचे विषबाधा वा वाहनांच्या धडकेमुळे मृत्यू होऊ लागले आहेत. याबाबत, वनखात्याने तातडीने उपाय करण्याची गरज प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे.