शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

एसटी बसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

By admin | Updated: May 21, 2016 01:33 IST

गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण - शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली

शेलपिंपळगाव : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवासासाठी एसटी बसअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण - शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने खेडच्या पूर्व भागातील सुमारे १० ते १२ गावांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचा सर्वाधिक फटका महाविद्यालयीन मुलींना सहन करावा लागत आहे.बहुळ, शेलपिंपळगाव, सिद्धेगव्हाण, साबळेवाडी, चौफुला, मोहितेवाडी, नवीनगाव, चिंचोशी, दौंडकरवाडी, रामनगर, शेलगाव, कोयाळी-भानोबाची, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, काळूस, संगमवाडी, दत्तवाडी, रासे आदी गावांतील बहुसंख्य विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी चाकण तसेच राजगुरूनगरमध्ये जात आहेत. बहुतांश विद्यार्थी पासधारक असल्याने शाळेत ये -जा करण्यासाठी एसटी बसचाच वापर त्यांना करावा लागत आहे. राजगुरूनगर, चाकणमधील महाविद्यालये साडेअकराच्या दरम्यान सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा घरी जाण्यासाठी चाकणहून दुपारी बाराच्या दरम्यान एसटी बस उपलब्ध नसल्याने, विद्यार्थ्यांची गैरसोय होते. परिणामी सर्वच विद्यार्थ्यांना बसपास किंवा एसटीपास असूनसुद्धा इतर वाहतुकीचा आसरा घेण्याची वेळ येत आहे. परिणामी वाहतुकीमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवासाचे जास्त पैसे आकारले जात असल्याने त्यांना नाहक ‘आर्थिक’ भुर्दंड सहन करून मार्गस्थ व्हावे लागते. चाकण-शिक्रापूर महामार्गावर चाकण आगारातून दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान नव्याने एसटी बस सुरु करून द्यावी, अशी मागणी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून केली जात आहे.।‘‘एसटी बसअभावी प्रवासास आम्हा विद्यार्थिनींची गैरसोय होत असून, धोका पत्करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा घरी येण्यासाठी वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवासाचा प्रश्न समोर उभा राहतो. आमची गरज लक्षात घेऊन आगार व्यवस्थापनाने नवीन शैक्षणिक वर्षात वेळेत बससेवा सुरु करून द्यावी.’’- महाविद्यालयीन विद्यार्थिनी>नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर सोय व्हावीशालेय व महाविद्यालयीन मुले रस्त्यावरील अवैध वाहतुकीचा आसरा घेऊन घरी मार्गस्थ होत असतात. परंतु मुलींना भीतीपोटी नाहक त्रास सहन करून एसटीचीच ताटकळत वाट पाहत उभे राहावे लागते. दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान चाकण चौकात हे चित्र नित्याचेच बनले आहे. दरम्यान रोडरोमिओंचा त्रासदेखील विद्यार्थिनींच्या पदरी येतो.चाकण-शिक्रापूर महामार्गावरून खासगी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असते. या वाहतुकीचे बहुतांशी चालक मद्यप्राशन करून वाहतूक करत असतात. शालेय विद्यार्थ्यांना सरकारी वाहन उपलब्ध नसल्याने या अवैध खासगी वाहतुकीचा आसरा घेऊन मार्ग काढावा लागतो. परंतु अशा मद्यपी चालकांमुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागत आहे.