शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

एसटी बसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

By admin | Updated: May 21, 2016 01:33 IST

गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण - शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली

शेलपिंपळगाव : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवासासाठी एसटी बसअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण - शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने खेडच्या पूर्व भागातील सुमारे १० ते १२ गावांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचा सर्वाधिक फटका महाविद्यालयीन मुलींना सहन करावा लागत आहे.बहुळ, शेलपिंपळगाव, सिद्धेगव्हाण, साबळेवाडी, चौफुला, मोहितेवाडी, नवीनगाव, चिंचोशी, दौंडकरवाडी, रामनगर, शेलगाव, कोयाळी-भानोबाची, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, काळूस, संगमवाडी, दत्तवाडी, रासे आदी गावांतील बहुसंख्य विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी चाकण तसेच राजगुरूनगरमध्ये जात आहेत. बहुतांश विद्यार्थी पासधारक असल्याने शाळेत ये -जा करण्यासाठी एसटी बसचाच वापर त्यांना करावा लागत आहे. राजगुरूनगर, चाकणमधील महाविद्यालये साडेअकराच्या दरम्यान सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा घरी जाण्यासाठी चाकणहून दुपारी बाराच्या दरम्यान एसटी बस उपलब्ध नसल्याने, विद्यार्थ्यांची गैरसोय होते. परिणामी सर्वच विद्यार्थ्यांना बसपास किंवा एसटीपास असूनसुद्धा इतर वाहतुकीचा आसरा घेण्याची वेळ येत आहे. परिणामी वाहतुकीमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवासाचे जास्त पैसे आकारले जात असल्याने त्यांना नाहक ‘आर्थिक’ भुर्दंड सहन करून मार्गस्थ व्हावे लागते. चाकण-शिक्रापूर महामार्गावर चाकण आगारातून दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान नव्याने एसटी बस सुरु करून द्यावी, अशी मागणी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून केली जात आहे.।‘‘एसटी बसअभावी प्रवासास आम्हा विद्यार्थिनींची गैरसोय होत असून, धोका पत्करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा घरी येण्यासाठी वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवासाचा प्रश्न समोर उभा राहतो. आमची गरज लक्षात घेऊन आगार व्यवस्थापनाने नवीन शैक्षणिक वर्षात वेळेत बससेवा सुरु करून द्यावी.’’- महाविद्यालयीन विद्यार्थिनी>नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर सोय व्हावीशालेय व महाविद्यालयीन मुले रस्त्यावरील अवैध वाहतुकीचा आसरा घेऊन घरी मार्गस्थ होत असतात. परंतु मुलींना भीतीपोटी नाहक त्रास सहन करून एसटीचीच ताटकळत वाट पाहत उभे राहावे लागते. दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान चाकण चौकात हे चित्र नित्याचेच बनले आहे. दरम्यान रोडरोमिओंचा त्रासदेखील विद्यार्थिनींच्या पदरी येतो.चाकण-शिक्रापूर महामार्गावरून खासगी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असते. या वाहतुकीचे बहुतांशी चालक मद्यप्राशन करून वाहतूक करत असतात. शालेय विद्यार्थ्यांना सरकारी वाहन उपलब्ध नसल्याने या अवैध खासगी वाहतुकीचा आसरा घेऊन मार्ग काढावा लागतो. परंतु अशा मद्यपी चालकांमुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागत आहे.