शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवादी भागात अपुरी पोलीस निवासस्थाने

By admin | Updated: December 10, 2015 02:51 IST

राज्यातील नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात येथे जाणारे पोलीस जवान मात्र हक्काच्या शासकीय निवासस्थानांपासून वंचित आहेत.

योगेश पांडे,  नागपूरराज्यातील नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात येथे जाणारे पोलीस जवान मात्र हक्काच्या शासकीय निवासस्थानांपासून वंचित आहेत. खुद्द राज्य शासनानेदेखील ही बाब कबूल केली असून निवासस्थाने बांधण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. येथे कार्यरत असलेले पोलीस शासकीय निवासस्थानांपासून वंचित असल्याची बाब समोर आली होती. यासंदर्भात विधानपरिषद सदस्य ख्वाजा बेग, राजेंद्र जैन, संदीप बाजोरिया यांच्यासह ११ आमदारांनी बुधवारी प्रश्न उपस्थित केला होता. याला शासनातर्फे देण्यात आलेल्या लेखी उत्तरात गोंदिया जिल्ह्यात मंजूर संख्याबळाच्या तुलनेत निवासस्थाने अपुरी असल्याची कबुली देण्यात आली. गोंदिया आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ३५६ निवासस्थाने बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. तसेच गडचिरोली मुख्यालय व प्राणहिता उपमुख्यालय येथे ८७६ निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली. शिवाय चंद्रपूर आस्थापनेवर पोलीस मुख्यालयात १४९ निवासस्थाने तर भद्रावती येथे ६४ निवासस्थाने बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात नमूद करण्यात आले.नक्षलवाद्यांविरोधात ‘सोशल’ जागृतीगडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीवर नियंत्रण आणता यावे यासाठी पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रसामुग्री पुरविण्यासोबतच राज्य शासनाकडून सामाजिक पातळीवरदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत. स्थानिक गावकऱ्यांना नक्षल चळवळीतून वेगळे करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. याअंतर्गत जनजागरण मेळावा, ग्रामभेट योजना, महाराष्ट्र दर्शन योजना, स्वावलंबन योजना इत्यादी राबविण्यात येत आहेत. यातूनच नक्षलवाद्यांविरोधात गावकऱ्यांकडून गावबंदी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचा प्रभाव दिसून येत असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे. माणिकराव ठाकरे, संजय दत्त, भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात शासनाने ही माहिती दिली आहे. याशिवाय नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी शस्त्र-दारूगोळा यांच्यासोबतच आधुनिक संपर्कव्यवस्था, वाहने, भूसुरूंग प्रतिबंधक वाहन, हेलिकॉप्टरदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘एरिया डॉमिनेशन’च्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेकडेदेखील लक्ष देण्यात येत आहे. नक्षलवाद्यांच्या कारवायांवर प्रतिबंध आणण्यासाठी नक्षलविरोधी शोध अभियान, गस्त, नाईट अ‍ॅम्बुळ, नाकाबंदी यांचे प्रमाणदेखील वाढविण्यात आले आहे, असेदेखील शासनाकडून स्पष्ट करण्यात आले.