शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भूलतज्ज्ञ बजावणार महत्त्वाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 03:52 IST

जगातील सर्वांत लठ्ठ ५०० किलो वजन असलेली महिला इजिप्तची ३६ वर्षीय इमान अहमद शनिवारी मुंबईत दाखल झाली. मात्र...

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ ५०० किलो वजन असलेली महिला इजिप्तची ३६ वर्षीय इमान अहमद शनिवारी मुंबईत दाखल झाली. मात्र, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी तिच्यावर करण्यात येणाऱ्या बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीमध्ये भूलतज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तब्बल ५०० किलो वजन असणाऱ्या इमानवर शस्त्रक्रियेदरम्यान भूल देणे आव्हानात्मक ठरणार आहे, अशी माहिती बेरिअ‍ॅट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांनी दिली.विशेषत: बेरिअ‍ॅट्रिक सर्जरीदरम्यान रुग्णाला देण्यात येणाऱ्या भुलीच्या प्रमाणाविषयी अत्यंत दक्षता बाळगावी लागते. त्यात शरीराच्या वजनाच्या क्षमतेप्रमाणे भुलीचे प्रमाण निश्चित केलेले असते. त्यानुसार, एक किलो वजनाला पाच मिलिलीटर भुलीचे प्रमाण असते. त्यानंतर, आवश्यकेतनुसार या प्रमाणात चढ-उतार कारावा लागते, असेही डॉ. बोरुडे यांनी सांगितले.यापूर्वी एका प्रकरणात काही तज्ज्ञ बेरिअ‍ॅट्रिक सर्जन्सनी ३०० किलो वजनाच्या रुग्णाला हाताळले होते, ती सर्जरी यशस्वी झाली होती. त्यामुळे अशा अपवादात्मक प्रकरणांमध्ये भुलीचे प्रमाण ठरविण्यासाठी ३-४ आठवड्यांपासून भूलतज्ज्ञ पूर्वतयारी करीत असतात. त्याचप्रमाणे, इमानच्या वैद्यकीय स्थितीचा प्रत्येक क्षणी अहवाल तपासून याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. (प्रतिनिधी)