शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अवयवदानाचे महत्व वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 02:19 IST

गेल्या दोन वर्षांपासून अवयवदानाच्या झालेल्या जनजागृतीमुळे अवयवदानात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबपर्यंत ५० व्यक्तींचे अवयवदान

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून अवयवदानाच्या झालेल्या जनजागृतीमुळे अवयवदानात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबपर्यंत ५० व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा आकडा ४२ ते ४५ इतको होता. पण, यंदा आकड्याने ५० चा टप्पा ओलांडल्यामुळे या सकारात्मक बदलाचे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी स्वागत केले आहे. मुलुंड येथे राहणारा एका व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी त्याचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर अवयवदानाचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे यकृतदान करण्यात आल्यामुळे एकाला जीवनदान मिळाले आहे. हे या वर्षातले पन्नासावे अवयवदान आहे. ५२ वर्षीय व्यावसायिक अचानक घरातच चक्कर येऊन पडल्याने तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मेंदू मृतावस्थेत गेला. या परिस्थितीमुळे त्या कुटुंबियांना अवयवदाना विषयी माहिती देण्यात आली. त्यावेळी या पुरुषाचे यकृतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका महिन्यापासून यकृताच्या आजाराने त्रस्त असलेली ४६ वर्षीय महिला प्रतिक्षा यादीत होती. तिला यकृत प्रत्यारोपित करण्यात आल्यामुळे तिला जीवनदान मिळाले आहे. त्याच्या नातेवाईकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला त्या महिलेला जीवनदान देता येणे शक्य झाले. महिलेची प्रकृती स्थिर असून पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिला रुग्णालयातच ठेवण्यात येईल असे डॉ. राकेश राय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)