शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

अवयवदानाचे महत्व वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 02:19 IST

गेल्या दोन वर्षांपासून अवयवदानाच्या झालेल्या जनजागृतीमुळे अवयवदानात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबपर्यंत ५० व्यक्तींचे अवयवदान

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून अवयवदानाच्या झालेल्या जनजागृतीमुळे अवयवदानात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबपर्यंत ५० व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा आकडा ४२ ते ४५ इतको होता. पण, यंदा आकड्याने ५० चा टप्पा ओलांडल्यामुळे या सकारात्मक बदलाचे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी स्वागत केले आहे. मुलुंड येथे राहणारा एका व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी त्याचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर अवयवदानाचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे यकृतदान करण्यात आल्यामुळे एकाला जीवनदान मिळाले आहे. हे या वर्षातले पन्नासावे अवयवदान आहे. ५२ वर्षीय व्यावसायिक अचानक घरातच चक्कर येऊन पडल्याने तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मेंदू मृतावस्थेत गेला. या परिस्थितीमुळे त्या कुटुंबियांना अवयवदाना विषयी माहिती देण्यात आली. त्यावेळी या पुरुषाचे यकृतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका महिन्यापासून यकृताच्या आजाराने त्रस्त असलेली ४६ वर्षीय महिला प्रतिक्षा यादीत होती. तिला यकृत प्रत्यारोपित करण्यात आल्यामुळे तिला जीवनदान मिळाले आहे. त्याच्या नातेवाईकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला त्या महिलेला जीवनदान देता येणे शक्य झाले. महिलेची प्रकृती स्थिर असून पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिला रुग्णालयातच ठेवण्यात येईल असे डॉ. राकेश राय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)