शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

कोपर्डीच्या मुळाशी अवैध दारू - मुख्यमंत्री

By admin | Updated: October 3, 2016 05:52 IST

कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या मुळाशी अवैध दारू असून, नराधमांनी अवैध दारू प्राशन करून ते भयानक कृत्य केले आहे.

मुंबई : कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या मुळाशी अवैध दारू असून, नराधमांनी अवैध दारू प्राशन करून ते भयानक कृत्य केले आहे. या नराधमांना फाशी होईलच; मात्र या अवैध दारू विरोधातील मोहीम यशस्वी करणे ही त्या पीडितेला खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी षण्मुखानंद सभागृहात बोलताना व्यक्त केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘आपले सरकार’ उपक्रमाअंतर्गत विविध सेवांचे लोकार्पण आणि योजनांचा शुभारंभ करण्यात आला. सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांना ३७० सेवा आॅनलाइन करणे, मुंबईत ४,७१७ सीसीटीव्हीच्या निगराणीचे लोकार्पण तसेच अवैध दारूनिर्मिती आणि विक्री विरोधातील मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गावोगावी ज्या अडचणी आहेत त्याच्या पाठीमागे अवैध दारूचा मोठा वाटा आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील या अवैध दारूविरोधात मोहीम आखण्याची सूचना केली होती. अवैध दारूविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असली तरी राज्याचा विस्तार पाहता ती पुरेशी नाही. अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन गावांपासून दूर आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करुन अवैध दारूच्या विरोधात मोहिमेची सुरुवात करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.२०१८ पर्यंत संपूर्ण राज्य डिजिटल डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील सर्व गावे डिजिटल कनेटिव्हिटीने जोडण्यात येतील. स्मार्ट सिटीप्रमाणेच राज्यातील सर्व खेडी स्मार्ट बनवू आणि महाराष्ट्राला देशातील पहिले डिजिटल राज्य बनविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आॅनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता व कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. सेवा हमी कायद्यामुळे जनतेला सेवा हक्क तर प्रशासनावर वेळेत सेवा देण्याची जबाबदारी पडली आहे. आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यामातून तत्काळ तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमामुळे नागरिकांना एकत्रित सेवा देणारा डिजिटल प्लॅटफार्म उपलब्ध झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मुंबईत १२०० वाय-फाय स्पॉटमुंबईत १२०० ठिकाणी वाय-फाय स्पॉट तयार करण्यात येणार असून १ मे पर्यंत मुंबईकरांना वायफाय सेवा पुरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. (प्रतिनिधी)>मुंबईला तिसरा डोळा मुंबईत १,५१० ठिकाणी उच्च दर्जाचे ४,७१७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्याद्वारे निगराणीच्या कामाचे आज लोकार्पण झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबईची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून, पोलीस दलाला तिसरा डोळा मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.