शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

कोपर्डीच्या मुळाशी अवैध दारू - मुख्यमंत्री

By admin | Updated: October 3, 2016 05:52 IST

कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या मुळाशी अवैध दारू असून, नराधमांनी अवैध दारू प्राशन करून ते भयानक कृत्य केले आहे.

मुंबई : कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या मुळाशी अवैध दारू असून, नराधमांनी अवैध दारू प्राशन करून ते भयानक कृत्य केले आहे. या नराधमांना फाशी होईलच; मात्र या अवैध दारू विरोधातील मोहीम यशस्वी करणे ही त्या पीडितेला खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी षण्मुखानंद सभागृहात बोलताना व्यक्त केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘आपले सरकार’ उपक्रमाअंतर्गत विविध सेवांचे लोकार्पण आणि योजनांचा शुभारंभ करण्यात आला. सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांना ३७० सेवा आॅनलाइन करणे, मुंबईत ४,७१७ सीसीटीव्हीच्या निगराणीचे लोकार्पण तसेच अवैध दारूनिर्मिती आणि विक्री विरोधातील मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गावोगावी ज्या अडचणी आहेत त्याच्या पाठीमागे अवैध दारूचा मोठा वाटा आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील या अवैध दारूविरोधात मोहीम आखण्याची सूचना केली होती. अवैध दारूविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असली तरी राज्याचा विस्तार पाहता ती पुरेशी नाही. अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन गावांपासून दूर आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करुन अवैध दारूच्या विरोधात मोहिमेची सुरुवात करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.२०१८ पर्यंत संपूर्ण राज्य डिजिटल डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील सर्व गावे डिजिटल कनेटिव्हिटीने जोडण्यात येतील. स्मार्ट सिटीप्रमाणेच राज्यातील सर्व खेडी स्मार्ट बनवू आणि महाराष्ट्राला देशातील पहिले डिजिटल राज्य बनविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आॅनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता व कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. सेवा हमी कायद्यामुळे जनतेला सेवा हक्क तर प्रशासनावर वेळेत सेवा देण्याची जबाबदारी पडली आहे. आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यामातून तत्काळ तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमामुळे नागरिकांना एकत्रित सेवा देणारा डिजिटल प्लॅटफार्म उपलब्ध झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मुंबईत १२०० वाय-फाय स्पॉटमुंबईत १२०० ठिकाणी वाय-फाय स्पॉट तयार करण्यात येणार असून १ मे पर्यंत मुंबईकरांना वायफाय सेवा पुरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. (प्रतिनिधी)>मुंबईला तिसरा डोळा मुंबईत १,५१० ठिकाणी उच्च दर्जाचे ४,७१७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्याद्वारे निगराणीच्या कामाचे आज लोकार्पण झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबईची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून, पोलीस दलाला तिसरा डोळा मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.