शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘आयआयएम-नागपूर’कडे अभियंत्यांचाच ओढा

By admin | Updated: May 7, 2017 04:33 IST

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘नागपूर-आयआयएम’ची पहिली ‘बॅच’ बाहेर

योगेश पांडे/ लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘नागपूर-आयआयएम’ची पहिली ‘बॅच’ बाहेर पडली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत व्यवस्थापनातील दर्जेदार शैक्षणिक संस्था ठरलेल्या ‘आयआयएम’कडे सर्वांत जास्त ओढा अभियंत्यांचाच राहिला आहे. यातही ‘आयटी’ क्षेत्रातील अनुभवी अभियंत्यांचे प्रमाण सर्वांत जास्त दिसून आले आहे. येत्या काळात हा ‘ट्रेण्ड’ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे घोषणा झाल्यानंतर ‘आयआयएम-नागपूर’चे पालकत्व देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे देण्यात आले आहे व तेथील अनेक प्राध्यापक नागपुरातदेखील धडे देतात. साधारणत: व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वाणिज्य, व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी जास्त प्रमाणात प्रवेश घेतात, असा समज आहे.मात्र ‘नागपूर-आयआयएम’ याला अपवाद ठरले आहे. ‘आयआयएम’च्या दोन्ही ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांचे ‘प्रोफाईल’ पाहिले असता येथील ९४ टक्के विद्यार्थी हे अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे असल्याचे स्पष्ट झाले.२०१५ सालच्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यातील ५१ विद्यार्थी हे अभियांत्रिकी पदवीधर होते. तर २०१६-१८ या ‘बॅच’मध्ये प्रवेशित ५६पैकी ५३ (९४.६४%) विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. वाणिज्य क्षेत्रातील केवळ २ (३.५७ %) विद्यार्थी असून, एकाने (१.७८ %) ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ‘आयटी’तील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ‘आयटी’ क्षेत्रातील अभियंत्यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक होते. सध्याच्या ‘बॅच’मध्ये ३२ विद्यार्थी (५७.१४ टक्के) ‘आयटी’ अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. तर उर्वरित २१ विद्यार्थी विविध अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर आहेत.अनुभवाची टक्केवारीअनुभव२०१५-१६२०१६-१८फ्रेशर्स३१ %७.१४ %० ते २ वर्षे३३ %१७.८६ %२ ते ३ वर्षे१६ %४२.८६ %३ वर्षांहून अधिक२० %३२.१४ %