शहरं
Join us  
Trending Stories
1
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
2
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
3
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
4
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
5
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
6
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
7
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
8
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
9
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
10
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
11
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
12
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
13
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
14
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
15
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
16
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
17
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
18
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
19
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
20
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश

औषधी खरेदीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 14, 2014 09:42 IST

मनपा दवाखान्यांसाठी औषध खरेदीकडे प्रशासनाचे तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असून औषधांसाठीची निविदा गेल्या दोन वर्षांपासून दिलेली नाही.

 

रुग्णांना चार ते पाच हजार रुपये खर्च

मनपा दवाखान्यांची स्थिती : दोन वर्षांपासून निविदाच नाही

जळगाव : मनपा दवाखान्यांसाठी औषध खरेदीकडे प्रशासनाचे तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असून औषधांसाठीची निविदा गेल्या दोन वर्षांपासून दिलेली नाही. त्यामुळे दरमहा लाख रुपयांची औषधी विनानिविदा खरेदी केली जात असून रुग्णाच्या नातेवाइकांना बहुतांश औषधी बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहे.मनपाकडून आर्थिक परिस्थिती ठीक नसतानाही सामान्य जनतेला रुग्णालयांच्या माध्यमातून अल्पदरात सेवा दिली जात असल्याचा दावा केला जात असला तरीही प्रत्यक्षात गोरगरीब जनतेला मात्र ही सेवा अल्पदरात मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. कारण मनपाच्या शाहू महाराज रुग्णालयासह तीन रुग्णालयांमध्ये सुतिकागृहाची सोय असून तेथे अल्पदरात तपासणी करून प्रसूतीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मनपा दवाखाने विभागाचे औषध खरेदीसाठीची निविदाच गेल्या दोन वर्षांपासून निघालेली नाही. त्यामुळे दरमहा एक लाखापर्यंतची औषधी ५00 रुपयांच्या बिलांच्या आधारे खरेदी केली जात आहे. टक्केवारीचा खेळनिविदा न मागविता रोखीने औषध खरेदी केल्यास संबंधिताना ३0 टक्के हिस्सा मिळत असल्यानेच निविदा प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजते. औषधे बाहेरून आणायला सांगितल्यावर रुग्णाचे नातेवाईक व कर्मचारी, डॉक्टरांमध्ये वादही होत असल्याचे समजते. शासनाने मोफत औषध पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच जेनेरिक औषधे खरेदी केली तरीही मनपाची मोठय़ा प्रमाणावर आर्थिक बचत होणार आहे. मात्र यासाठी औषधांची यादी तयार करण्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबितच असल्याचे समजते. रुग्णांना चार ते पाच हजार रुपये खर्च मनपाची औषधांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. आरसीएचसाठी शासनाकडून वर्षभरापूर्वी औषधी मिळाली होती. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी आणखी प्रस्ताव पाठविला. मात्र शासनाकडून औषधी मिळालेली नाही. एनयुएचएमअंतर्गत औषधांसाठी प्रस्ताव मागविले आहेत. त्याचे काम सुरू आहे.-डॉ. राम रावलानी,मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

दरमहा लाखाची औषधी खरेदी केली जात असली तरीही प्रसूतीसाठी दाखल रुग्णाच्या नातेवाइकांना औषधांची यादी हाती सोपवून बाहेरून औषधे विकत आणायला सांगितली जात आहेत. जी औषधी मोफत मिळायला हवी, त्यापोटी चार-पाच हजार रुपये खर्च रुग्णाच्या नातेवाइकांना करावा लागत आहे. मनपा प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.