शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

दुर्गम भागात सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 04:38 IST

अतिदुर्गम भागात एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.

मंगेश भांडेकर,

चंद्रपूर- अतिदुर्गम भागात एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यावर तोडगा करण्यासाठी राज्य शासनाने बीएएमएस डॉक्टरांची या पदांवर नियुक्ती केली. मात्र त्यांची नियुक्ती अस्थायी स्वरूपाची असल्याने त्यांना शासनाच्या सर्व सोईसुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यासही त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात येत नाही. त्यामुळे या डॉक्टरांमध्ये रोष पसरला आहे.एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी शासनाने आयुक्त व आरोग्य सेवा उपसंचालक यांची अध्यक्ष व सचिव म्हणून नियुक्ती करून २००५ मध्ये राज्यभरात ७९१ बीएएमएस डॉक्टरांची अस्थायी स्वरूपात नियुक्ती केली आहे. त्यामुळे वार्षिक वेतनवाढ, गटविमा, अंशदायी निवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी यासारख्या योजना या डॉक्टरांना लागू नाहीत. त्यातच कर्तव्यावर मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कोणतीही मदत मिळत नाही. या डॉक्टरांच्या समस्या महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाने वेळोवेळी शासनदरबारी मांडल्या. मात्र त्याकडे शासनाचे दुर्लक्षच होत आहे. >डॉक्टरांनी गमावला जीवकर्तव्यावर असताना रुग्णवाहिकेचा अपघात होऊन डॉ. अरुण जंगले व डॉ. रोशन अहिरे यांचा मृत्यू झाला. तसेच डॉ. राम हुमने यांचे हृदयविकाराने, डॉ. अरुण थोरात यांचे पाण्यात बुडून, डॉ. दिनेश पाटील यांचा अपघातात, डॉ. शैलेंद्र गणवीर यांचा हृदयविकाराने, डॉ. प्रमोद वाळुंजकर यांचा किडनीच्या आजाराने, डॉ. कृष्णा मरस्कोल्हे यांचा कर्करोगाने आणि डॉ. रविराम जरकर यांचे हृदयविकाराने निधन झाले. मात्र या डॉक्टरांच्या कुटुंबांना शासनाकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही.>दारुकांडातील मृतांना शासनाने आर्थिक मदत दिली. बस अपघातातील मृतांना शासनाकडून मदत मिळते. मात्र कर्तव्यावर एखाद्या बीएएमएस डॉक्टरचा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत दिली जात नाही, हा अन्याय आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून बीएएमएस डॉक्टरांना स्थायी करावे व शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळवून द्यावा.- डॉ. स्वप्निल टेंभे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघ, चंद्रपूर