शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे

By admin | Updated: September 15, 2015 20:22 IST

मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे नाहीतर रिक्षा चालवण्याचा परवाना मिळणार नाही अशी महत्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - मराठी बोलता येत नसेल तर मुंबईत रिक्षा चालवण्याचा परवाना मिळणार नाही असा आदेश परिवहन मंत्रालयातर्फे काढण्यात आला आहे. मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर रिक्षावाल्यांना मराठी येणं बंधकारक असल्याची महत्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली असून यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. 
येत्या काळात मुंबईत १ लाख नव्या रिक्षासांठी परवाने देण्यात येणार आहेत. तसेच परवाने रद्द झालेल्या सुमारे १ लाख ४० हजार ऑटोरिक्षांना सरकारकडून पुन्हा परवाने देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून त्यासाठी १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 
ज्या रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलता येईल त्यांनाच रिक्षा चालवण्याचा परवाना देण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार असून परवाना देण्यापूर्वी रिक्षा चालकांची मराठी भाषेची परीक्षा घेण्यात येणार आहे. ते जर त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले तरच त्यांना परवाना देण्यात येईल, अन्यथा नाही असे रावते यांनी स्पष्ट केले आहे. 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येक व्यक्तीला मराठी येणं गरजेचं आहे, मात्र त्यासाठी अशी सक्ती करणं चुकीचं आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहिर यांनी मांडली आहे.