शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

वेळ पडल्यास आणखी कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना मदत करा

By admin | Updated: July 29, 2016 03:36 IST

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी समाधानी नाही, अशी टीका करतानाच राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज भासली तर शेतक-यांसाठी

मुंबई :राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी समाधानी नाही, अशी टीका करतानाच राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज भासली तर शेतक-यांसाठी राज्य सरकारने आणखी कर्ज काढावे. पण अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. राज्यातील सततची दुष्काळी स्थिती आणि राज्य सरकारने करायच्या उपाययोजना यासंदर्भात विरोधकांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. सुरुवात करताना राणे म्हणाले की, राज्यावर गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटे ओढवत आहेत. परिणामी आर्थिक अडचणीतील शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. गेल्या एका वर्षात आत्महत्यांमध्ये सोळा टक्क्यांनी वाढल्याचे सरकार सांगत आहे. सरकारने कृषी क्षेत्रात शाश्वत उपाययोजना केल्या असत्या, दुष्काळग्रस्तांना पिण्याचे पाणी, पुरेसे अन्न-धान्य, शालेय विद्यार्थ्यांची फी माफी आणि शेतक-यांना वेळीच मदत दिली असती तर आत्महत्यांची संख्या घटली असती. सध्यस्थितीत राज्यात शेतकरी समाधानी नाही, असे सांगत राणे यांनी अच्छे दिनाच्या घोषणेची खिल्ली उडवली. विरोधकांनी सातत्याने शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. मात्र, मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यावधींचा खर्च, कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग, व्यापा-यांना सात हजार कोटींची एलबीटी माफी करणा-या सरकारला शेतक-यांबाबत कणव नाही. सत्तेत येण्याआधी केलेली आश्वासने कुठे गेली, असा सवाल राणे यांनी केला.दुष्काळी मराठवाड्यातून स्थलांतर वाढले दुष्काळी मराठवाड्यातून स्थलांतर वाढले आहे. हे महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला कलंक आहे, अशी टीका राणे यांनी केली. प्रगत राज्य म्हणून राज्याची ओळख आहे. संकटातील शेतक-यांना मदत करा. राज्यावर सध्या तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज पडल्यास आणखी कर्ज काढा पण राज्यातील शेतक-यांना सक्षम करण्यासाठी मदत करा, अशी मागणी राणे यांनी केली.