शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वेळ पडल्यास आणखी कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना मदत करा

By admin | Updated: July 29, 2016 03:36 IST

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी समाधानी नाही, अशी टीका करतानाच राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज भासली तर शेतक-यांसाठी

मुंबई :राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी समाधानी नाही, अशी टीका करतानाच राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज भासली तर शेतक-यांसाठी राज्य सरकारने आणखी कर्ज काढावे. पण अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. राज्यातील सततची दुष्काळी स्थिती आणि राज्य सरकारने करायच्या उपाययोजना यासंदर्भात विरोधकांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. सुरुवात करताना राणे म्हणाले की, राज्यावर गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटे ओढवत आहेत. परिणामी आर्थिक अडचणीतील शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. गेल्या एका वर्षात आत्महत्यांमध्ये सोळा टक्क्यांनी वाढल्याचे सरकार सांगत आहे. सरकारने कृषी क्षेत्रात शाश्वत उपाययोजना केल्या असत्या, दुष्काळग्रस्तांना पिण्याचे पाणी, पुरेसे अन्न-धान्य, शालेय विद्यार्थ्यांची फी माफी आणि शेतक-यांना वेळीच मदत दिली असती तर आत्महत्यांची संख्या घटली असती. सध्यस्थितीत राज्यात शेतकरी समाधानी नाही, असे सांगत राणे यांनी अच्छे दिनाच्या घोषणेची खिल्ली उडवली. विरोधकांनी सातत्याने शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. मात्र, मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यावधींचा खर्च, कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग, व्यापा-यांना सात हजार कोटींची एलबीटी माफी करणा-या सरकारला शेतक-यांबाबत कणव नाही. सत्तेत येण्याआधी केलेली आश्वासने कुठे गेली, असा सवाल राणे यांनी केला.दुष्काळी मराठवाड्यातून स्थलांतर वाढले दुष्काळी मराठवाड्यातून स्थलांतर वाढले आहे. हे महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला कलंक आहे, अशी टीका राणे यांनी केली. प्रगत राज्य म्हणून राज्याची ओळख आहे. संकटातील शेतक-यांना मदत करा. राज्यावर सध्या तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज पडल्यास आणखी कर्ज काढा पण राज्यातील शेतक-यांना सक्षम करण्यासाठी मदत करा, अशी मागणी राणे यांनी केली.