शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दलितांवरील अत्याचार थांबवू शकत नसाल तर त्यांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्या

By admin | Updated: October 23, 2015 13:27 IST

सरकार व पोलीस दलितांचे रक्षण करण्यास कमी पडत असेल तर त्यांनी दलितांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्यावीत, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ - दलितांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतच आहे. सरकार आणि पोलीस जर त्यांचे रक्षण करण्यास कमी पडत असल्यास त्यांनी दलितांना स्वरक्षणासाठी हत्यारे द्यावीत, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. तसेच दलितांवरील अत्याचारासंबंधी वादग्रस्त वक्तव्ये करणारे व्ही.के. सिंग यांच्यावरही आठवले यांनी टीका केली असून सिंह यांच्यासारख्या नेत्याने अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत असे आठवले म्हणाले. 
गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे देशातील असहिष्णुता वाढत असल्याची टीका सर्व स्तरातून होत असतानाच मंगळवारी हरियाणात दलित कुटुंबाच्या घरास उच्चवर्णीयांनी लावलेल्या आगीत दोन लहान मुले जळून मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली. केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी या घटनेवर बोलताना कोणी कुत्र्याला दगड मारला तरी केंद्र सरकारलाच जबाबादार धरणार का असे वक्तव्य केले.  एवढ्या संवदेनशील विषयाबाबत सिंह यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे गदारोळ माजला आहे. सर्व स्तरांतून सिंह यांच्यावर टीका होत असून त्यांना मंत्रीमंडळातून हाकलण्यात यावे अशी मागणी होत आहे.