शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

कर्जमुक्ती दिल्यास आम्ही सत्ता सोडू

By admin | Updated: May 20, 2017 05:35 IST

राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील यासाठी सर्व्हे केला जात आहे. मध्यावधीची चाचपणी कशाला करता? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील यासाठी सर्व्हे केला जात आहे. मध्यावधीची चाचपणी कशाला करता? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, आम्ही सरकारला बाहेरून भक्कम पाठिंबा देऊ, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील शेतकरी मेळाव्यात केली.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने हाती घेतलेल्या अभियानाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाला. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारे, तसेच भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘केंद्रात व राज्यात सत्ता मिळूनही भाजपा सत्तापिपासू झाली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील, यासाठी सर्व्हे केला जात आहे.’’ तूरखरेदीतील घोटाळ्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना सरकार शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार बदलले, तरी चेहरा तोच असल्याची खंत व्यक्त करून उद्धव यांनी, मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ‘अभ्यासू विद्यार्थी’ झाल्याचा टोला लगावला. समृद्धी महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. साले म्हणणाऱ्यांचे सालपट काढूशेतकऱ्यांना ‘रडतात साले’ असे म्हणणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. दानवेंचे ते विधान ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली. सत्तेची मस्ती चढल्यामुळेच अशा प्रकारची भाषा केली जात असेल तर साले म्हणणाऱ्यांचे सालपट काढू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.कर्जमुक्ती नसेल, तर खात्यावर १५ लाख द्या!उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नोटाबंदी व मन की बात या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टीकेचे लक्ष्य केले. परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याच्या घोषणेचे काय झाले? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देता येत नसेल, तर त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १५ लाख रुपये टाका, असे ठाकरे म्हणाले.शेतकऱ्यांवरील कर्ज सरकारचेच पाप : शेट्टी : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मोदी सरकारने ३ वर्षांत पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हे सरकारचेच पाप असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी केला. २२ मेपासून पुणे-मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.