शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती दिल्यास आम्ही सत्ता सोडू

By admin | Updated: May 20, 2017 05:35 IST

राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील यासाठी सर्व्हे केला जात आहे. मध्यावधीची चाचपणी कशाला करता? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील यासाठी सर्व्हे केला जात आहे. मध्यावधीची चाचपणी कशाला करता? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, आम्ही सरकारला बाहेरून भक्कम पाठिंबा देऊ, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील शेतकरी मेळाव्यात केली.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने हाती घेतलेल्या अभियानाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाला. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारे, तसेच भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘केंद्रात व राज्यात सत्ता मिळूनही भाजपा सत्तापिपासू झाली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील, यासाठी सर्व्हे केला जात आहे.’’ तूरखरेदीतील घोटाळ्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना सरकार शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार बदलले, तरी चेहरा तोच असल्याची खंत व्यक्त करून उद्धव यांनी, मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ‘अभ्यासू विद्यार्थी’ झाल्याचा टोला लगावला. समृद्धी महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. साले म्हणणाऱ्यांचे सालपट काढूशेतकऱ्यांना ‘रडतात साले’ असे म्हणणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. दानवेंचे ते विधान ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली. सत्तेची मस्ती चढल्यामुळेच अशा प्रकारची भाषा केली जात असेल तर साले म्हणणाऱ्यांचे सालपट काढू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.कर्जमुक्ती नसेल, तर खात्यावर १५ लाख द्या!उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नोटाबंदी व मन की बात या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टीकेचे लक्ष्य केले. परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याच्या घोषणेचे काय झाले? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देता येत नसेल, तर त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १५ लाख रुपये टाका, असे ठाकरे म्हणाले.शेतकऱ्यांवरील कर्ज सरकारचेच पाप : शेट्टी : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मोदी सरकारने ३ वर्षांत पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हे सरकारचेच पाप असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी केला. २२ मेपासून पुणे-मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.