शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

विदर्भ झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काही उरणार नाही - श्रीहरी अणे

By admin | Updated: January 14, 2016 13:25 IST

विदर्भ झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही' असे वक्तव्य करत महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १४ - स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घेण्याची मागणी केल्याने वादात सापडलेले महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भवरून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ' विदर्भ झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही' असे अणे यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान म्हटले असून आता पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. 
स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य अणे यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी केले होते.  वेगळ्या विदर्भाच्या नावावर तेलंगणाप्रमाणे केवळ हिंसक आंदोलन अभिप्रेत असल्याची टीकाही अणे यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून खवळलेल्या शिवसेनेने अधिवेशनात गदारोळ माजवला होता. अणेंच्या या वक्तव्याविरोधात सेनेने हक्कभंग प्रस्तावही आणला होता. तो वाद शमतो ना शमतो तोच अणे यांनी विदर्भावरून नवे वक्तव्य करत नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.
 
श्रीहरी अणेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेमध्ये मोठी नाराजी असून गेल्याच महिन्यात शिवसेना आमदारांनी विधानसभेच्या पाय-यांवर बसून आंदोलन केले. नेहमी अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार करणा-या शिवसेना नेत्यांनी अणेंना बडतर्फ करण्याची मागणी केली. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहीजे असे सेना आमदारांचे म्हणणे आहे. 
विदर्भातलं जनमत घेतलं तर ८० टक्के लोक स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असतील, असे वक्तव्य अणे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं