शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सिंधुदुर्गवर अन्याय झाल्यास मंत्र्यांची गाडी अडवू : राणे

By admin | Updated: December 11, 2014 23:42 IST

जिल्ह्यात होऊ घातलेले प्रकल्प बंद करून आमच्यावर अन्याय करणार असाल, तर यापुढे एकाही मंत्र्याची गाडी जिल्ह्यात फिरू देणार नाही.

सावंतवाडी : गेल्या पाच वर्षात विधानसभेत तोंड न उघडणाऱ्या आमदारांनी आता राज्यमंत्री झाल्यावर जिल्ह्याचा विकास आराखडा ७५ हजार कोटींवरून एक लाख कोटीपर्यंत घेऊन जावे, आम्ही त्याचे स्वागत करू. मात्र, जिल्ह्यात होऊ घातलेले प्रकल्प बंद करून आमच्यावर अन्याय करणार असाल, तर यापुढे एकाही मंत्र्याची गाडी जिल्ह्यात फिरू देणार नाही. गाडीच्या आडवा उभा राहणारा मी पहिला असेन, असा इशारा काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला.ते सावंतवाडी तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, सभापती प्रमोद सावंत, गुरूनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, तालुकाध्यक्ष संजू परब, बाळा गावडे, मंदार नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर आतापर्यंत कोणत्याही आमदाराने आवाज उठवला नाही. आमदार नीतेश राणे यांनी तीन दिवसात विधानसभा दणाणून सोडली. येथील आमदार मागच्या सरकारात होते. त्यावेळी त्यांनी आपली निष्ठा शरद पवारांवर वाहिली होती. पवारच आपले बाप म्हणत पण आता पवारांना सोडून मातोश्रीच्या दरवाजावर जाऊन मंत्रीपद मिळवले. मंत्रिपदाला कोणीही विचारत नाही आणि कोणी त्यांचे सल्लेही घेत नाही. फक्त नावाला राज्यमंत्री असतात, असे सांगत राणे यांनी जिल्ह्याचा आराखडा युती सरकार येताच कमी झाला असून तो आराखडा १ लाख कोटींवर नेऊन ठेवा, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, काँगे्रस संघटनेत बदल करण्याची वेळ येऊन ठेपली असून आता आपणास विरोधी पक्षात असल्याचे भान ठेऊन काम केले पाहिजे. सर्वांनी एकीने काम करा आणि पुन्हा एकदा आपल्या बद्दलचा विश्वास निर्माण करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या मेळाव्यात डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, अंकुश जाधव, बाळा गावडे, सभापती प्रमोद सावंत आदींनी विचार मांडले. या मेळाव्याचे प्रास्ताविक अन्वर खान यांनी तर नारायण राणे यांचे स्वागत संजू परब यांनी केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (प्रतिनिधी)‘त्यासाठी’ प्रधान सचिवांना फोन केलामी कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेत नाही. मात्र, सावंतवाडीत विद्युत तारा पडून दोन युवकांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत प्रधान सचिवांना फोन केला आणि युवकांच्या पत्नीला नोकरी देण्याची सूचना केली. त्याला सचिवांनी संमती दर्शवली असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.