शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गवर अन्याय झाल्यास मंत्र्यांची गाडी अडवू : राणे

By admin | Updated: December 11, 2014 23:42 IST

जिल्ह्यात होऊ घातलेले प्रकल्प बंद करून आमच्यावर अन्याय करणार असाल, तर यापुढे एकाही मंत्र्याची गाडी जिल्ह्यात फिरू देणार नाही.

सावंतवाडी : गेल्या पाच वर्षात विधानसभेत तोंड न उघडणाऱ्या आमदारांनी आता राज्यमंत्री झाल्यावर जिल्ह्याचा विकास आराखडा ७५ हजार कोटींवरून एक लाख कोटीपर्यंत घेऊन जावे, आम्ही त्याचे स्वागत करू. मात्र, जिल्ह्यात होऊ घातलेले प्रकल्प बंद करून आमच्यावर अन्याय करणार असाल, तर यापुढे एकाही मंत्र्याची गाडी जिल्ह्यात फिरू देणार नाही. गाडीच्या आडवा उभा राहणारा मी पहिला असेन, असा इशारा काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला.ते सावंतवाडी तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, सभापती प्रमोद सावंत, गुरूनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, तालुकाध्यक्ष संजू परब, बाळा गावडे, मंदार नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर आतापर्यंत कोणत्याही आमदाराने आवाज उठवला नाही. आमदार नीतेश राणे यांनी तीन दिवसात विधानसभा दणाणून सोडली. येथील आमदार मागच्या सरकारात होते. त्यावेळी त्यांनी आपली निष्ठा शरद पवारांवर वाहिली होती. पवारच आपले बाप म्हणत पण आता पवारांना सोडून मातोश्रीच्या दरवाजावर जाऊन मंत्रीपद मिळवले. मंत्रिपदाला कोणीही विचारत नाही आणि कोणी त्यांचे सल्लेही घेत नाही. फक्त नावाला राज्यमंत्री असतात, असे सांगत राणे यांनी जिल्ह्याचा आराखडा युती सरकार येताच कमी झाला असून तो आराखडा १ लाख कोटींवर नेऊन ठेवा, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, काँगे्रस संघटनेत बदल करण्याची वेळ येऊन ठेपली असून आता आपणास विरोधी पक्षात असल्याचे भान ठेऊन काम केले पाहिजे. सर्वांनी एकीने काम करा आणि पुन्हा एकदा आपल्या बद्दलचा विश्वास निर्माण करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या मेळाव्यात डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, अंकुश जाधव, बाळा गावडे, सभापती प्रमोद सावंत आदींनी विचार मांडले. या मेळाव्याचे प्रास्ताविक अन्वर खान यांनी तर नारायण राणे यांचे स्वागत संजू परब यांनी केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (प्रतिनिधी)‘त्यासाठी’ प्रधान सचिवांना फोन केलामी कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेत नाही. मात्र, सावंतवाडीत विद्युत तारा पडून दोन युवकांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत प्रधान सचिवांना फोन केला आणि युवकांच्या पत्नीला नोकरी देण्याची सूचना केली. त्याला सचिवांनी संमती दर्शवली असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.