शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

लग्नात 100 हून जास्त लोक आल्यास पोलीस करणार पाहुणचार

By admin | Updated: August 24, 2016 13:31 IST

राज्य सरकारने एक असा मसुदा तयार केला आहे ज्यामुळे सत्यनारायण पूजा, वाढदिवसाची पार्टी, लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये विग्न येऊ शकतं

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करत असाल आणि त्यासाठी पाहुण्यांची यादी तयार करत आहात तर 100 हून जास्त पाहुण्यांना आमंत्रित करणं तुमच्या अडचणी वाढवू शकतं. राज्य सरकारने एक अशा प्रकारच्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे ज्यामुळे सत्यनारायण पूजा, वाढदिवसाची पार्टी, लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये विघ्न येऊ शकतं. या मसुद्याचं कायद्यात रुपांतर झाल्यास 100 हून जास्त पाहुण्यांना आमंत्रित करताना पोलिसांची परवानगी घेणं अनिवार्य असणार आहे.
 
महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सेक्युरिटी अॅक्टचं जर कायद्यात रुपांतर झालं तर अशा कार्यक्रमांमध्ये 100 हून जास्त लोकांना आमंत्रित करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विना परवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्यास किमान तीन वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. तशी तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे.
 
सरकारने या मसुद्यावर तज्ञ आणि सामान्यांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 19 ऑगस्टला हा मसुदा सरकारी वेबसाईटवर जारी करण्यात  आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या गृह मंत्रालयाने हा मसुदा तयार केला आहे. विरोधी पक्षांनी मात्र या प्रस्तावित कायद्याला विरोध केला आहे. काळा कायदा उल्लेख करत काँग्रेस - राष्ट्रवादीने हा मुसदा मागे घेण्याची मागणी केली आहे. 
 
या कायद्यासाठी 7 सदस्यांची एक समिती गठित केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष स्वत: गृहमंत्री असणार आहेत. तसेच या समितीत गृहराज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभाग प्रमुख असणार आहेत. 
 
'सशस्त्र दल विशेष कायद्याप्रमाणे (आफ्सपा) महाराष्ट्र सरकारला पोलीस दल विशेष कायदा (पाफ्सपा) लागू करुन पोलिसांना असीमित अधिकार द्यायचे आहेत', अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
 
 
असा कायदा करणं तुम्हाला पटतं का ?...तुमच्या प्रतिक्रिया कळवा