शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर भारताचा पाकिस्तान झाला असता

By admin | Updated: November 30, 2015 17:15 IST

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपली लोकशाही कोसळून भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे मत कांचा इलाय यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० -  पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर आपली लोकशाही कोसळून भारताची अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे वक्तव्य प्रसिद्ध दलित कार्यकर्ते व लेखत कांचा इलाय यांनी केले. एक इंग्रजी वृत्तपत्राच्या चर्चासत्रात ते बोलत होते. 
' सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान बनले असते तर देशाचा प्रवास वेगल्या पद्धतीने झाला असता, असे नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हटले होते. पटेल पंतप्रधान असते, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहूच दिली नसती, मनुस्मृतीच्या समर्थकांनी राज्यघटना लिहीली असती, कारण पटेल यांची हिंदु महासभेशी जवळीक होती. असे इलाय म्हणाले. पटेल यांच्या नेतृत्वाखाली आपलीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती,  लोकशाही कोसळली असती. पहिल्या १७ वर्षांतच भारताचा पाकिस्तान झाला असता, असे मत इलाय यांनी वक्त केले 
दरम्यान भाजपाचे माजी नेते आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे  प्रमुख सुधींद्र कुलकर्णी यांनीही इलाय यांच्या मताशी सहमती दर्शवली. सध्याची आव्हाने पाहता, त्यावर मार्ग काढण्यासाठी पटेल यांचा विशेष उपयोग नाही. आपल्याला पोलाद पुरुषाची गरज नसून देशास सर्वसमावेशक दृष्टिकोन असलेल्या सहृदयी नेत्याची सध्या गरज आहे, असे कुलकर्णी म्हणाले.
इलाय यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.