शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर प्रसंगी नक्षलवाद्यांच नेतृत्व करेन - उदयनराजे भोसले

By admin | Updated: September 24, 2016 16:35 IST

मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर प्रसंगी नक्षलवाद्यांच नेतृत्व करेन अशी धमकीच मराठा मूक मोर्चासाठी नाशिकमध्ये हजेरी लावलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली आहे

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24 - मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर प्रसंगी नक्षलवाद्यांच नेतृत्व करेन अशी धमकीच मराठा मूक मोर्चासाठी नाशिकमध्ये हजेरी लावलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली आहे. मोर्चानंतर उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन नेहमीच्या स्टाईलप्रमाणे सडेतोड मत व्यक्त केलं.
 
'कोपर्डीतील बलात्कार ही छत्रपती शिवाजींच्या स्वराज्याला काळिमा आहे. त्या नराधमांना जाहीर फाशी द्या. अशा नराधमांना लोकांसमोर गोळ्या घालायला हव्या, असं उदयनराजे बोलले आहेत. मराठे मोर्चे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नाही. त्वरित न्याय देणे देशाच्या हिताचं आहे. न्याय मिळत नसल्याने लोकांचा सरकारांवरचा, पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. सामाजिक समतोल टिकायचा असेल तर कायद्यात बदल करा,' अशी मागणी यावेळी उदयनराजेंनी केली.
 
'मराठ्यांनी मूकमोर्चे काढले आहेत. परिस्थिति बिघडली तर उद्रेक होईल. लीबिया, सीरिया सारखी परिस्थिति होऊ देऊ नका. पक्षपेक्षा देशाचा विचार करा. मराठा ही जात नाही जीवन जगण्याची संस्कृती आहे. स्पर्धेच्या युगात फक्त मेरिट हाच निकष असला पाहिजे. मराठा सोडून सर्वांना आरक्षण देतात. कुठल्याही जातीचा असो, आर्थिकदृष्टया गरीब असेल त्याला आरक्षण द्या. स्पर्धेच्या युगात आरक्षणामुळे प्रगती खुंटली आहे,' असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं.
'जाती-जातींचे मोर्चे निघताय, पण ही काय स्पर्धा लागली आहे का? असा सवाल उदयनराजेंनी यानिमित्ताने उपस्थित केला. आरक्षण असल्याने भारतातले संशोधक अमेरिकेत गेले. राज्यकर्त्यांनी जाती तयार केल्या.नेते अभिनेत्यांपेक्षा जास्त चांगला अभिनय करतात. सर्वाधिक कर्जांची परतफेड शेतकरी करतात, उद्योगपती कर्ज बुडवतात,' असा टोमणा उदयनराजेंनी मारला. 
 
'पैशांचा गैरवापर करुन न्याययंत्रणा आणि पोलिस यंत्रणांना ताब्यात घेऊन चेष्टा केली जात आहे. स्पर्धेच्या युगात फक्त मेरिट हाच निकष असला पाहिजे. मेक इंडिया नाही तर ब्रेक इंडिया होत आहे. कायदा नव्हता तेव्हाही लोक जगतच होते. आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धड़ा शिकवा. आरक्षण, अॅट्रोसिटीवर निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यात यावं,' अशी मागणी उदयनराजेंनी यानिमित्ताने केली.