शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला नाही, तर मिळेल त्याला शेततळे

By admin | Updated: May 14, 2016 00:30 IST

‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने सुरू केली आहे. मात्र शेततळ्यासाठी असलेले अवघे पन्नास हजार रुपये अनुदान व प्रत्येक तालुक्याला दिलेली उद्दिष्ट तसेच याच्या अटी

घोडेगाव : ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने सुरू केली आहे. मात्र शेततळ्यासाठी असलेले अवघे पन्नास हजार रुपये अनुदान व प्रत्येक तालुक्याला दिलेली उद्दिष्ट तसेच याच्या अटी व शर्ती पाहिल्या असता ‘मिळेल त्याला शेततळे’ असे नाव या योजनेचे ठेवले पाहिजे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियान व टंचाई आढावा बैठकीत केली. आंबेगाव तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातून १३ गावांमध्ये कामे सुरू आहेत. या गावातील कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच तालुक्यात दोन टँकर सुरू असून, अजून सहा टँकरची मागणी झाली आहे. नुकतेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळात तालुक्यात लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, मांदळेवाडी, वडगावपीर या सहा गावांचा समावेश होतो. येथील लोकांना शासन देणार असल्याच्या सुविधांची चर्चा झाली.या वेळी प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, सभापती जयश्री डोके, उपसभापती सुभाष तळपे, समाजकल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, एस.बी. देवडे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मगर, आंबेगाव तहसीलदार बी. जी. गोरे, शिरूर तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, कृषी अधिकारी संजय विश्वासराव, संजय पिंगट, पंचायत समिती सदस्य कैलासबुवा काळे, संजय गवारी, खंडू पारधी, सुषमा शिंदे, अनिता निघोट, प्रियंका लोखंडे, मालिनी भोर, रेवती वाडेकर, प्रकाश घोलप इत्यादी उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले, मागेल त्याला शेततळे या योजनेत शासनाने घातलेल्या अटी किचकट आहेत. शेततळे घेण्यासाठी संबंधित गाव पाच वर्षात एक वर्ष पन्नास टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेले असावे व लाभार्थ्याकडे कमीत कमी दीड एकर जमीन असावी. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील फक्त ५५ गावे आली आहेत. येथील ४० लाभार्थ्यांनी अर्ज केले होते मात्र अवघे १६ लाभार्थी पात्र झाले आहेत. त्यामुळे मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना फसवी असून त्याला नाव ‘मिळेल त्याला शेततळे’ असे दिले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.