शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सरकारला निर्णय महागात पडणार तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 05:20 IST

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने अतिशय साहसी पाऊल उचलले आहे; मात्र त्यात धोकेही भयावह आहेत. पहिला धोका हा आहे की

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने अतिशय साहसी पाऊल उचलले आहे; मात्र त्यात धोकेही भयावह आहेत. पहिला धोका हा आहे की, नोट बदलण्यासाठी देशातील सुमारे १२० कोटी लोक अतिशय त्रस्त झाले आहेत. बँका आणि एटीएम मशीनवर लागलेल्या रांगांमुळे लोकांना दम लागला आहे. नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे काही लोकांचा जीव गेला. अनेकांवर उपासमारीची पाळी आली. अनेकांच्या विवाहप्रसंगी वातावरण दु:खात पालटून गेले. आनंदावर विरजण पडले. अनेकांची दुकाने बंद पडली. लाखो गावांमध्ये एकही बँक नाही. ज्यांनी घाम गाळून मोठी कमाई केली. त्यांचीही झोप उडाली आहे. काहींना हृदयविकाराचे झटके आले. गरीब, ग्रामीण आणि कष्टकरी लोकांवरील संकट दूर व्हावे यासाठी आम्ही आमच्या राज्यांमध्ये जुन्या नोटाच चालवू, असे बडे नेते म्हणत आहेत. बिहार आणि मध्य प्रदेशातील काही गावांमध्ये भुकेल्या ग्रामीण मजुरांनी धान्याची दुकाने लुटली. येत्या दोन- तीन दिवसांमध्ये लोकांच्या अडचणी दूर होतील, असा दावा सरकारने यापूर्वी केला आहे, तथापि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एटीएम मशीन योग्यरीत्या चालविण्यासाठी आणखी १५-२० दिवस लागतील असे फर्मान सोडले आहे. ज्या लाखो गाव- खेड्यांमध्ये मशीन आणि बँका नाहीत तेथील नागरिक काय करतील? असा माझा सवाल आहे. ज्यांनी बँकांचे तोंडही पाहिले नाही, अशा लोकांची अडचण तर आणखी वाढणार आहे. हा त्रास या सरकारला खड्ड्यात तर नाही ना घालणार? देशाच्या १२० कोटी लोकांना या ‘काळा पैसा’ बाहेर काढण्याच्या योजनेचा नेमका कोणता फायदा होईल, हा खरा प्रश्न आहे. लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल? त्यांचा ५०० चा नोट १००० मध्ये चालेल? नाही. त्यांच्या वाट्याला केवळ दु:ख आणि अडचणीच येत आहेत. ते देशभक्त आहेत. ते सरकारला साथ देत आहेत. त्यांनी तसे केलेही पाहिजे. हेच लोक रांगेल लागून मतदान करायला जात असतात. ज्यांच्याकडे काळ्या पैशांचा ढीग जमलेला आहे, ते लोक मतदानासाठी कधी रांगेत उभे राहात नाहीत. नेते, दहशतवादी आणि तस्करांसोबतच या ‘काळ्या धनिकां’नी आपला पैसा अनेक व्यवसायांमध्ये गुंतविलेला आहे. त्यांना पकडण्याचा कोणताही उपाय सरकारकडे असेल असे वाटत नाही. ज्या सर्वसामान्य जनतेच्या मतांवर हे सरकार स्थापन झाले आहे, त्या लोकांना संताप अनावर होणार नाही म्हणजे झाले. (लेखक ज्येष्ठ हिंदी पत्रकार आहेत.)