शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सरकारला निर्णय महागात पडणार तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 05:20 IST

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने अतिशय साहसी पाऊल उचलले आहे; मात्र त्यात धोकेही भयावह आहेत. पहिला धोका हा आहे की

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने अतिशय साहसी पाऊल उचलले आहे; मात्र त्यात धोकेही भयावह आहेत. पहिला धोका हा आहे की, नोट बदलण्यासाठी देशातील सुमारे १२० कोटी लोक अतिशय त्रस्त झाले आहेत. बँका आणि एटीएम मशीनवर लागलेल्या रांगांमुळे लोकांना दम लागला आहे. नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे काही लोकांचा जीव गेला. अनेकांवर उपासमारीची पाळी आली. अनेकांच्या विवाहप्रसंगी वातावरण दु:खात पालटून गेले. आनंदावर विरजण पडले. अनेकांची दुकाने बंद पडली. लाखो गावांमध्ये एकही बँक नाही. ज्यांनी घाम गाळून मोठी कमाई केली. त्यांचीही झोप उडाली आहे. काहींना हृदयविकाराचे झटके आले. गरीब, ग्रामीण आणि कष्टकरी लोकांवरील संकट दूर व्हावे यासाठी आम्ही आमच्या राज्यांमध्ये जुन्या नोटाच चालवू, असे बडे नेते म्हणत आहेत. बिहार आणि मध्य प्रदेशातील काही गावांमध्ये भुकेल्या ग्रामीण मजुरांनी धान्याची दुकाने लुटली. येत्या दोन- तीन दिवसांमध्ये लोकांच्या अडचणी दूर होतील, असा दावा सरकारने यापूर्वी केला आहे, तथापि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एटीएम मशीन योग्यरीत्या चालविण्यासाठी आणखी १५-२० दिवस लागतील असे फर्मान सोडले आहे. ज्या लाखो गाव- खेड्यांमध्ये मशीन आणि बँका नाहीत तेथील नागरिक काय करतील? असा माझा सवाल आहे. ज्यांनी बँकांचे तोंडही पाहिले नाही, अशा लोकांची अडचण तर आणखी वाढणार आहे. हा त्रास या सरकारला खड्ड्यात तर नाही ना घालणार? देशाच्या १२० कोटी लोकांना या ‘काळा पैसा’ बाहेर काढण्याच्या योजनेचा नेमका कोणता फायदा होईल, हा खरा प्रश्न आहे. लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल? त्यांचा ५०० चा नोट १००० मध्ये चालेल? नाही. त्यांच्या वाट्याला केवळ दु:ख आणि अडचणीच येत आहेत. ते देशभक्त आहेत. ते सरकारला साथ देत आहेत. त्यांनी तसे केलेही पाहिजे. हेच लोक रांगेल लागून मतदान करायला जात असतात. ज्यांच्याकडे काळ्या पैशांचा ढीग जमलेला आहे, ते लोक मतदानासाठी कधी रांगेत उभे राहात नाहीत. नेते, दहशतवादी आणि तस्करांसोबतच या ‘काळ्या धनिकां’नी आपला पैसा अनेक व्यवसायांमध्ये गुंतविलेला आहे. त्यांना पकडण्याचा कोणताही उपाय सरकारकडे असेल असे वाटत नाही. ज्या सर्वसामान्य जनतेच्या मतांवर हे सरकार स्थापन झाले आहे, त्या लोकांना संताप अनावर होणार नाही म्हणजे झाले. (लेखक ज्येष्ठ हिंदी पत्रकार आहेत.)